AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता काही खरं नाही…बीसीसीआयची सटकली, तातडीने कारवाई होणार, तो एक निर्णय अन् सगळचं बदलणार

भारत इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय वाईटच दिसली, आता यानंतर भारतीय संघावर जोरदार कारवाई होणार आहे.

आता काही खरं नाही...बीसीसीआयची सटकली, तातडीने कारवाई होणार, तो एक निर्णय अन् सगळचं बदलणार
ind vs eng
| Updated on: Jul 10, 2026 | 2:05 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. संघाला अजून एकही सामना जिंकता आलेले नाही ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आता याबाबत बीसीसीआय आक्रमक होणार असून एक मोठी कारवाई होण्याची ही भीती नाकारता येत नाही. आता भारतीय संघाचे केवळ इंग्लंडविरुद्धच नाही तर आयर्लंडविरुद्धही प्रदर्शन खराब पाहायला मिळाले. मागील काही काळात भारतीय संघाची टी-20 बाजू उत्तम होती प्रदर्शन अगदी तगडे होते पण आता तसे पाहायला मिळाले नाही.

इंग्लंड दौऱ्यावर सलग तीन टी-20 सामन्यांतील पराभवानंतर बीसीसीआय भारतीय संघावर कारवाई करु शकते. वृत्तानुसार, टी-20 मालिकेतील निराशाजनक कामगिरीबद्दल बीसीसीआय संघाच्या प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेऊ शकते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा करार 2027 पर्यंत आहे, परंतु बीसीसीआयच्या सूत्रांनुसार संघाच्या अलीकडील कामगिरीमुळे त्यांची नोकरी धोक्यात आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दोन टी-20 मालिका गमावल्या आहेत. भारतीय संघ आयर्लंडकडून 2-0 ने पराभूत झाला होता आणि आता इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत चार सामने खेळले गेले असून, मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

इंग्लंड दौऱ्यादरम्यान अनेक व्यवस्थापकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे बीसीसीआय भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेणार असल्याची अफवा पसरत आहे. विशेषतः, संजू सॅमसनला संघातून वगळल्याबद्दल संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यानंतर संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी सलामीवीर म्हणून वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली, पण तो प्रभावी ठरलेला नाही. दुसरीकडे, ईशान किशन आणि तिलक वर्मा यांचा फॉर्मसुद्धा भारतीय संघासाठी डोकेदुखी बनला आहे. आयर्लंड मालिकेसह या संपूर्ण दौऱ्यात तिलक वर्मा फलंदाजीत अपयशी ठरलेला दिसत आहे.

Follow Us
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या...
नातवासाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी स्वयंपाकघरात थेट पुऱ्या तळल्या, व्हिडिओवर नेटकरी फिदा
खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर एकाचा जागीच मृत्यू
Roha Accident | खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी! रोहा उड्डाण पुलावर पोलीस पाटलाचा जागीच मृत्यू
महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर?
Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र ATSचा मोठा धडाका! राज्यभर अचानक छापे; 100 जण रडारवर? थेट पाकिस्तानशी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?