
दिव्या अग्रवाल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दिव्या अग्रवाल हिचे नुकताच लग्न झालंय. दिव्या अग्रवाल हिच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

नुकताच आता दिव्या अग्रवालने मोठा खुलासा केलाय. दिव्या अग्रवालने सांगितले की, तिच्या वाईट काळात अपूर्व (पती) याने तिची साथ दिलीये.

हेच नाही तर दिव्या अग्रवाल हिने सांगितले की, वरुण सूद याच्यासोबत तिचे ब्रेकअप झाल्यानंतरही अपूर्व हा तिच्यासोबत होता.

दिव्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. यावेळी देखील अपुर्व हा तिच्यासोबत होता. नेहमीच अपुर्वने तिला साथ दिलीये.

दिव्या अग्रवाल हिचे ज्यावेळी वरुण सूद याच्यासोबत ब्रेकअप झाले होते, त्यावेळी ती पूर्णपणे तुटलेली होती. सर्वकाही संपल्याचे तिला वाटत होते.