
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही. यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होतात. ज्याचा थेट परिणाम दररोजच्या जीवनावर होतो.

सध्या नोकरी, घरातील काम आणि इतर कामांमुळे खाण्यापिण्याकडे म्हणावे तसे लक्ष अजिबातच देता येत नाही. बऱ्याचदा आपल्यापैकी अनेकजण सकाळचा नाश्ता करणेही टाळतात.

आपल्या आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळचे जेवण महत्वाचे ठरते. मात्र, व्यवस्थित जेवण न घेता अनेकजण थेट पॅक केलेले पदार्थ खातात.

पॅक केलेले चिप्स असोत किंवा बिस्किट हे खाण्यावर लोकांचा भर वाढला. अशा गोष्टी खाऊन जेवण टाळले जाते. कुठेही बसून किंवा उभे राहून हे खाता येते.

भारतीयांमध्ये पॅक केलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड बनला आहे. ज्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पॅक केलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी अजिबातच फायदेशीर नाहीये.