AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाचा चौकार, तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पुन्हा फेल

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारताला अक्षरश: लोळवलं. भारताचा या सामन्यात धावांनी पराभव झाला.

IND vs ENG : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाचा चौकार, तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पुन्हा फेल
IND vs ENG : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाचा चौकार, तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिला पुन्हा फेलImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 08, 2026 | 1:13 AM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पुन्हा फेल गेली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात चौथा पराभव सहन करावा लागला आहे. संघाची धुरा हाती घेतल्यापासून टीम इंडिया पराभवाचं तोंड पाहात आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2ने गमावल्यानंतर इंग्लंडमध्येही हाराकिरी सुरूच आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना खूपच महत्त्वाचा होता. हा सामना गमावल्याने आता मालिका गमवण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करणं पसंत केलं. मात्र हा निर्णय देखील चुकला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना भारतीय संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर पराभव निश्चित झाला. या पराभवानंतर इंग्लंडने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे भारत ही मालिका जिंकणार तर नाही. पण मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

भारताचा डाव

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना भारताने पावरप्ले मधेच नांगी टाकली. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र दोघंही फेल गेले. इतकंच काय तर मधल्या फळीची कमकुवत फलंदाजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. अभिषेक शर्मा 10 आणि वैभव सूर्यवंशी 13 धावा करून बाद झाले. भारताने पावरप्लेच्या 6 षटकात पाच गडी गमवून फक्त 54 धावा केल्या होत्या. त्यामुळे पराभव हा निश्चित झाला होता. इशान किशन 13. श्रेयस अय्यर 5, अक्षर पटेल 10, तिलक वर्मा 3, हार्षित राणा 9, शिवम दुबे 2, अर्शदीप सिंग 4, वरुण चक्रवर्ती 5 धावा करून बाद झाले. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 76 धावांवर बाद झाला. यासह भारताने हा सामना 125 धावांनी गमावला.

इंग्लंडकडून जोश टंगने भेदक गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 28 धावा देत 4 गडी बाद केले. त्यानंतर जोफ्रा आर्चरने 3 षटकात 29 धावा देत 3 गडी बाद केले. तर अदिल राशीद 2.4 षटकात 14 धावा देत 2 गडी बाद केले. तर विल जॅक्सने 2 षटकात 5 धावा देत 1 गडी बाद केला.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण