AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी पहिलो गोड बातमी… चिंतेचे ढग दूर, विहार तलाव ओसंडून वाहतोय

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीटंचाईची चिंता आता दूर झाली आहे, कारण मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव आज रात्री ९ वाजता पूर्ण भरून ओसंडून वाहत आहे. जोरदार पावसामुळे हे शक्य झाले असून, मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईकरांसाठी पहिलो गोड बातमी... चिंतेचे ढग दूर, विहार तलाव ओसंडून वाहतोय
Vihar LakeImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jul 07, 2026 | 11:09 PM
Share

पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर भीषण पाणी टंचाईचे ढग जमा झाले होते. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती. पण हे चिंतेचे ढग आता दूर झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला विहार तलाव दुथडी भरून वाहू लागला आहे. आज रात्री 9 वाजताच तलाव भरला. तलाव क्षेत्र परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने हा तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अजून मुंबईला पाणीपुरवठा करणारे सहा तलाव भरायचे बाकी आहेत. या तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस असून हे तलावही लवकरच भरतील अशी मुंबईकरांना आशा आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी एक असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ आज दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्यावर्षी दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता.

२७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०२४ मध्ये दिनांक २५ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०२३ मध्‍ये दिनांक २६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

बृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा दोन सर्वात लहान तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. सन १८५९ मध्ये ६५ लाख रुपये खर्चून विहार तलाव बांधण्यात आला आहे.

विहार तलावाची संक्षिप्त माहिती…

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.

या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.

या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.

तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर अर्थात २,७६९.८० कोटी लिटर एवढा असतो.

हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण