AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, 5 जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी कोसळधारा सुरूच!

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेरच्या खदाणीत फिरायला गेल्यानंतर ही तिन्ही मुलं सेल्फी काढत होते. सेल्फी काढत असताना एका बालकाचा पाय घसरला. त्या मुलाला वाचवण्याचा दोघांनी प्रयत्न केला.

महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, 5 जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी कोसळधारा सुरूच!
jalgaon rain updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2026 | 10:42 PM
Share

 Jalgaon Rain Update : सध्या राज्यात पावसाने थैमान घातले आहे. कोकण किनारपट्टी, नाशिक, पुणे, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांत सगळीकडे पाऊसच पाऊस आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. उपनगरातील काही भागात तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लोकलची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या सर्व परिस्थितीमुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही नद्यांना पूर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे कुठे दरड कोसळून तर कुठे इमारत कोसळून निष्पाप लोकांचा मृत्यू होत आहे. जळगावातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका खदाणीत तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एका खदाणीत बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे सध्या खदाणी, नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अशा स्थितीत नागरिक उत्साहाने फिरायला घराबाहेर पडत आहेत. परंतु उत्साहाच्या भरात अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. या तीन बालकांसोबतही असेच काहीसे घडले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात या तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

तीन मुलं नेमकं काय करत होते?

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेरच्या खदाणीत फिरायला गेल्यानंतर ही तिन्ही मुलं सेल्फी काढत होते. सेल्फी काढत असताना एका बालकाचा पाय घसरला. त्या मुलाला वाचवण्याचा दोघांनी प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.

पावसामुळे खदानीत मोठ्या प्रमाणावर पाणी

समोर आलेल्या माहितीनुसार मानव बंटी रतनानी वय १४, कार्तिक विकी उधवानी वय १४ व दिनेश विजय पंजवानी वय १७ अशी तिन्ही मृतांची नावे आहेत. पावसामुळे खदानीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याची माहिती समोर आली आहे. एका वेळी 3 निरागस मुलांचा मृत्यू झाल्याने सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त केला जात आहे.

विरारमध्ये तिसरा बळी

दुसरीकडे सलग चार दिवसापासून सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे नालासोपाऱ्यात तिसरा बळी गेला आहे. अतिवृष्टीत मित्र सोबत मैदानात साचलेल्या पाण्यात पोहत असताना, त्यातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने १३ वर्षाच्या मुलाचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

मुंब्रा कौसा भागात इमारतीची गॅलरी कोसळली…

ठाण्यातील मुंब्रा कौसा भागात ३० ते ३४ वर्षे जुन्या चांदणी इमारतीची गॅलरी कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीखाली चहाची टपरी चालवणारा २४ वर्षीय तरुण अब्दुल रहमान शेख गंभीर जखमी असून डोक्याला दुखापत झाल्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोणावळ्यात भीषण भूस्खलन, एकाचा मृत्यू

लोणावळ्यातील जुना खंडाळा येथील नॉर्थ पॉइंट आणि थ्री सिक्सटी रिसॉर्ट परिसरात मध्यरात्री अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत रिसॉर्टवरील एक माळी आणि एक सुरक्षा रक्षक असे दोन जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत थेट युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू केले .शर्थीच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर अद्याप एक जण अडकून पडला आहे. दरम्यान, परिसरातील मलबा बाजूला केल्यानंतरही वरून पुन्हा ढिगारा खाली येत असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत.

Follow Us
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट….

मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट…

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

EPF News : 40 व्या वर्षी नोकरी सोडली, 58 व्या वयापर्यंत खात्यात येईल व्याज ? नवा नियम काय?.

EPF News : 40 व्या वर्षी नोकरी सोडली, 58 व्या वयापर्यंत खात्यात येईल व्याज ? नवा नियम काय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा