खवड्या डोंगरावर आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेलेला, हादरवून टाकणारी माहिती, नातेवाईकांनी..
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर मोठी दुर्देवी घटना घडली. मुलगा, आई आणि वडील यांचे निधन झाले. मुलाचा एक हट्ट आणि पूर्ण कुटुंब संपले. कुणालला वाचवण्यासाठी आई वडिलांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. तिघांनीही एकाचवेळी जगाचा निरोप घेतला.

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर कुणाल चांदगुडे कड्याच्या अगदी जवळ उभा राहिला. यादरम्यान त्याची आई हात जोडून विनवण्या करत होती. लेकाला वाचवण्यासाठी तिने प्रत्येक प्रयत्न केला. हेच नाही तर मी वडिलांना सोडते म्हणत तिने गळ्यातील मंगळसूत्रही काढून फेकले. पण तीन तासाच्या प्रयत्नांना अपयश आले. कुणालचे वडील त्याला पकडण्यासाठी पुढे गेले आणि कुणाल आणि ते दोघेही पाय घसरून खाली कोसळले. नवऱ्याला आणि मुलाला कोसळताना पाहून आईने त्यांच्या पाठोपाठ उडी घेतली. या घटनेने देश सुन्न झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, कुणालला आयफोन 15 हवा होता. त्यावरूनच वडिलांसोबत त्याचा वाद झाला. मात्र, त्यानंतर खुलासा झाला की, कुणाल याच्याकडे दोन आयफोन होते. त्यामुळे वडिलांसोबत आयफोनवरून कोणताही वाद झाला नव्हता.
कुणाल आणि त्याच्या कुटुंबियात नक्की काय झाले, हे सांगायला तिघेही जिवंत नाहीत. मात्र, नातेवाईकांनी मोठा खुलासा केला. कुणालच्या काकांनी यादरम्यान बोलताना सांगितले की, त्याच्या आई वडिलांमध्ये छोटे वाद होते. पण कुणालला ते अजिबात हवे नव्हते. त्याला घरात शांती हवी होती. त्याचे वडील जास्त करून बाहेर राहायचे. तो आणि त्याची आई जास्त राहत.
तो त्याच्या आईवर खूप जास्त प्रेम करत होता. त्याचा जीव आईवर होता. तो खवड्या डोंगरावर आई वडिलांनी वाद करून नये, याकरिता त्यांना भीती घालण्यासाठी गेला होता. पण ज्यावेळी त्याचे वडील त्याला पकडण्यासाठी गेले, त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि दोघेही खाली पडले. काकांनी स्पष्ट केले की, कुणालच्या आई वडिलांमध्ये काही वाद होते. पण ते काही मोठे नव्हते, छोटेच होते.
हेच नाही तर ज्यावेळी कुणाल उडी मारण्यासाठी उभा होता, त्यावेळी त्याची आईही खाली उतरली होती. आईला खाली उतरल्याचे पाहून तिला वर जाण्यास तो सांगत होता. हेच नाही तर उपस्थित लोकांना तिला वर येण्यासाठी हात द्या, अशीही विनंती करताना कुणाल दिसला. तू वर जा… तू वर जा… असे तो आपल्या आईला वारंवार सांगत होता. आई वडिलांना भीती घालण्यासाठी कुणाल गेला आणि पूर्ण कुटुंब संपले.
