
ज्या अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील खास क्षण शेअर केले आहेत, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गिरिजा ओक आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

जर तुम्ही फोनवर कोणला बोलू शकत असला, माझ्या घरी पाणी नाहीये मी तुझ्याकडे अंघोळीला येत आहे... याच्यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणती असू शकते... एका मुलाखतीत अभिनेत्री गिरिजा ओक हिने तिच्या खास मैत्रिणीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

मैत्रिणीबद्दल गिरिजा म्हणाली, 'सायली माझी फार जुनी मैत्रीण आहे. ती मझ्या नवऱ्याची मैत्रिण आहे, पण आता ती माझी चांगली मैत्रिण झाली आहे. सायली पुण्यात राहते...' पुण्यात घडलेला एक किस्सा सांगत गिरीजा हिने खास क्षण सांगितलें.

अभिनेत्री म्हणाली, 'मुसळधार पाऊस सुरु होता. वीजेचा खांब पडला होता... काही लोकांचा मृत्यू झालेला... आमच्या पूर्ण परिसरातील लाईट नव्हती, जवळपास दोन ते तीन दिवस लाईट नव्हती... तेव्हा पाणी येतच नव्हतं...

'अशा वेळी मी सायली हिला फोन करायची आणि सांगायची मी तुझ्या घरी अंघोळीला येत आहे आणि सायलीच्या घरी मी अनेकदा अंघोळ देखील केली आहे... निशिगंधा देखील चांगली मैत्रीण आहे... तीच्या घरी जाऊन देखील मी अंघोळ केली आहे... तेव्हा त्यांच्या घरून मी जेवून देखील निघाली आहे... असं देखील गिरिजा म्हणाली.