
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण नसू शकते.

सध्याची बदललेली जीवनशैली ही केसगळती आणि केस पांढरे होण्यामागील मोठे कारण आहे. केसगळतीची मोठी समस्या ताण आहे.

जर तुम्ही अधिकवेळ तणावात असाल तर केसगळतीची समस्या जाणवते. यामुळे जर तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर सर्वात अगोदर जीवनातील तणाव कमी करा.

यासोबतच महत्वाचे आहे की, तुमचा आहार. केसगळतीचे महत्वाचे कारण हे आहार देखील आहे. हेल्दी खाण्यावर भर द्या. यामुळे केसगळती दूर होऊ शकते.

आठवड्यातून तुम्ही कितीवेळा केस धुवत आहात हे देखील महत्वाचे आहे. सतत तुम्ही केमिकलयुक्त शॅम्पू वापरत असाल तर त्यामुळेही केस गळती होऊ शकते.