59 वर्षांपूर्वीच्या गाण्यात एक चूक, आजही प्रेक्षक ओळखू शकले नाहीत, लता मंगेशकर यांनी दिला आवाज
आजही बॉलिवूडमधील अनेक गाणी लोकप्रिय आहेत. या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामधील एक गाणे लता मंगशेकर यांनी गायले होते. त्यांच्या या गाण्याने सर्वांचे मन जिंकले होते. पण या गाण्यात एक चूक झाली होती. ती कोणती जाणून घ्या...

श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतो. मुसळधार कोसळणारा पाऊस कमी होतो. रिमझिम पाऊस मन प्रसन्न करते. अशा वेळी काही गाणी अशी असतात जी सर्वांचे आवडती असतात. बाहेर पडणारा रिमझिम पाऊस आणि लता मंगेशकर यांचे गाणे याची कल्पना करुनपण मन सुखावते. पण अशाच एका गाण्यातील चूक आजही कोणाच्या लक्षात आली नाहीये. तुम्हाला हे गाणे कोणते माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

आम्ही ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत ते गाणे गायक मुकेश आणि लता मंगेशकर यांचे ‘सावन का महीना पवन करे शोर’ आहे. या गाण्यात सुनील दत्त आणि नूतन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिलन’ चित्रपटात हे गाणे होते. याचे संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल होते. गीतकार आनंद बक्षी होते. तर लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजाने या गाण्याला अमर बनवलं. कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर सुनील दत्त, प्राण, नूतन, जमुना, देवेन वर्मा आणि श्यामा हे कलाकार चित्रपटात दिसले होते.

आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल काहीसे असे होते - ‘सावन का महीना, पवन करे सोर’. पण ‘सावन का महीना’ गाण्यात आनंद बक्षी यांनी ‘पवन करे शोर’ ऐवजी ‘पवन करे सोर’ शब्द लिहिला. खरं तर त्यांनी असं केलं कारण सुनील दत्त उत्तर भारतीय पात्राची भूमिका साकारत होते, जो खेड्यात राहणारा होता आणि अनेक शब्दांचा उच्चार त्याच बोलीत करत होता. त्यामुळे गाणेही त्याच शैलीत लिहिण्यात आलं.

IMDb नुसार, नंतर गोव्याच्या गायिका लोर्ना यांच्या “टेग नौरे” (Teg Noure) या गाण्यासाठी ‘सावन का महीना’ गाण्याचा सॅम्पल वापरण्यात आला. या गाण्याचे संगीत क्रिस पेरी यांनी दिलं होतं. तरीही लता मंगेशकर यांची आवाज आजही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

युट्युबवर हे गाणे ऐकताना एका यूजरने लिहिलं, “काय शब्द रचना आहे गजब!” दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, “मी हे गाणे खेड्यात छतावर रात्रीच्या वेळी ऐकलं होतं, जेव्हा खरोखरच पूर्वैया वारा वाहत होता. तो अनुभव इतका जादुई होता की आजही आठवण येते आणि आठवण करताना माझ्या चेहऱ्यावर आनंदाची हास्य उमटते.”