
Premanand Maharaj Gurumantra: काही जण रस्त्याने जाताना, एखादं काम करताना, शौचास गेल्यावर वा समागमाच्या काळातही काही जणांना देव आठवतो. पण असं करणं योग्य आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांना हा प्रश्न सतावतो. काय आहे त्याचे उत्तर?

बिछान्यावर बसून नामस्मरण करावे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. जसं बिछान्यावर बसून, बेडवर बसून जेवण करू नये असा दंडक आहे, तसेच नामस्मरण करावे की नाही याविषयी संभ्रम आहे. प्रेमानंद महाराज यांनी याविषयी विवेचन केले आहे.

त्यांनी नाम जप अथवा गुरुमंत्र जपण्याचे काही नियम सांगितले आहे. त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी त्यासाठी काही मर्यादा सांगितल्या आहे. कारण मनातील भावांनाही मोठे महत्त्व असते. त्यामुळे धर्मशास्त्रात मनाला सिंचन करण्याचे खास नियम दिले आहेत.

एका महिला भाविकाने बिछाण्यावर बसून नामस्मरण करता येते की नाही याविषयीचा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेले उत्तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे आहे. बिछान्यावर, शौचास गेल्यावरही देवाचे नाव घेता येते असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एका श्लोकाचा उल्लेख केला.

या श्लोकानुसार, व्यक्ती अपवित्र असो वा पवित्र, कोणत्याही परिस्थितीत जर ती व्यक्ती देवाचे स्मरण करेल , तर ती आतून आणि बाहेरून पवित्र होते. त्यामुळे मनात भाव असेल श्रद्धा असेल तेव्हा कोणतेही सोहळे वा नियमांचे बंधन पाळता तुम्ही नामस्मरण करू शकता.

पण गुरुमंत्राला हा नियम लागू होत नाही. गुरुमंत्राच्या जपाबाबत काही नियम आहेत. ज्या बेडवर गृहास्थाश्रमाचे पालन करतात. तिथे बसून गुरुमंत्राचा जप करू नये. शौचालयात अथवा कोणत्याही अपवित्र अवस्थेत गुरुमंत्राचा जप करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.