
पश्चिम मध्य रेल्वे विभागमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

पश्चिम मध्य रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी आणि शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. दहावी पास असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज हे करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेतून 3 हजार 15 पदे भरली जाणार आहेत.

दहावी पास असण्यासोबतच उमेदवाराकडे आयटीआय पासचे प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. चला तर मग फटाफट करा अर्ज.