AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 90 धावांनी धुव्वा उडवत अचूक हिशोब, 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली

India vs Pakistan U19 Match Result : अंडर 19 टीम इंडियाला पाकिस्तान विरूद्धच्या या विजयासाठी तब्बल 5 वर्ष प्रतिक्षा करावी लागली. भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वातमध्ये की कामगिरी केली.

IND vs PAK : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 90 धावांनी धुव्वा उडवत अचूक हिशोब, 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली
U19 Team India vs PakistanImage Credit source: ACC X ACCOUNT
| Updated on: Dec 14, 2025 | 10:22 PM
Share

टीम इंडियाने अंडर 19 वनडे आशिया कप 2025 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने यूएईनंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने दुबईतील आयसीसी एकेडमी ग्राउंडवर आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात पाकिस्तानला 90 धावांनी पराभवाची धुळ चारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. पाकिस्तानला पूर्ण 49 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी धारदार बॉलिंगच्या जोरावर पाकिस्तानला 41.2 ओव्हरमध्ये 150 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे सलग दुसरा विजय साकारला.

विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. पाकिस्तानसाठी हुजेफा अहसान याने सर्वाधिक 70 धावा केल्या. अहसानने या खेळीत 2 षटकार आणि 9 चौकार लगावले. कॅप्टन फरहान युसफ याने 23 धावांचं योगदान दिलं. तर ओपनर उस्मान खान याने 16 धावा जोडल्या. त्या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. टीम इंडियासाठी दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. किशन कुमार सिंह याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेर रस्ता दाखवला. तर खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत पाकिस्तानचं पॅकअप करण्यात योगदान दिलं.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या स्टार जोडीने निराशा केली. वैभव 5 धावांवर बाद झाला. तर आयुष मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. आयुषने 39 धावांचं योगदान दिलं.

टीम इंडियासाठी या सामन्यात एरॉन जॉर्ज आणि कनिष्क चौहान जोडीने सर्वाधिक धावा केल्या. एरॉनने 85 तर कनिष्कने 46 धावांचं योगदान दिलं. अभिग्यान याने 22 धावा केल्या. तर विहान मल्होत्रा आणि हेनिल पटेल या दोघांनी प्रत्येकी 12-12 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 240 धावांपर्यंत पोहचता आलं. मात्र टीम इंडियालाही 49 ओव्हर खेळता आलं नाही. पाकिस्तानने टीम इंडियाला 46.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं. पावसामुळे हा सामना 49 ओव्हरचा करण्यात आला होता.

पाकिस्तानचा हिशोब, 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली

दरम्यान टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तानचा हिशोब केला. पाकिस्तानने गेल्या वर्षी अंडर 19 आशिया कप स्पर्धेतच पराभूत केलं होतं. भारताने या पराभवाची परतफेड केली. तसेच टीम इंडियाने या विजयासह 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली. अंडर 19 टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध अखेरचा सामना हा 2020 साली जिंकला होता. त्यानंतर पाकिस्तानने सलग 3 सामन्यात भारताला पराभूत केलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.