
1 मार्च, तर र्च 2026--प्रत्येक भारतीयाच्या, क्रिकेटप्रेमीच्या लक्षात राहील असा क्षण, असा खेळ. ज्याची आठवण अजून कित्येक वर्ष काढली जाईल, येणाऱ्या पिढ्यांसाठी हा सामना म्हणजे एक ठेव असेल. हा फक्त एक विजय नव्हता 11 वर्षांचं दुर्लक्ष, ट्रोलिंग आणि अश्रूंचा केलेला चोख हिशोब होता हिशोब... जेव्हा संजू सॅमसनने (Sanju Samson) वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी षटकार मारला आणि तो 97 धावांवर नाबाद राहिला, तेव्हा कॅमेऱ्यांनी लाखो भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ते दुर्लभ क्षण टिपले.( Photos : Social Media)

'शून्यापासून शिखरापर्यंत' झालेल्या एका खेळाडूचा हा प्रवास, त्याचे ते क्षण फक्त कॅमेऱ्यात नव्हे तर आपल्या डोळ्यात आणि आठवणीत साठवून ठेवण्यासारखेच आहेत खरंच. संजू सॅमनसच्या वादळी, पण तितक्याच उत्तम खेळीनंतरचे हे भारावणारे क्षण पहाच..

संजूने टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं, तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया आक्रमक नव्हती तर कृतज्ञतेची होती. त्याने त्याच्या बॅटचे चुंबन घेतलं आणि डोळे मिटून आकाशाकडे पाहिलं. 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला तो एक दिलासा होता, त्यामध्ये त्याने फक्त 66 आंतरराष्ट्रीय सामने खेळल. पण कालचा हा एक क्षण होता ज्याने हे पुन्हा दाखवून दिलं की 'भगवान के घर देर है, अंधेर नहीं'..

संजू मैदानाबाहेर पडत असतानाच एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. नेहमीच गंभीर असलेला प्रशिक्षक गौतम गंभीर बाऊंड्री लाईनवर उभा होता. संजू जवळ येताच गंभीरने त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. गंभीरने नंतर खुलासा केला की संजूला संघातून वगळणे ही त्याला मोठ्या दिवसासाठी तयार करण्याची एक रणनीती होती. त्याचे "ब्रह्मास्त्र" यशस्वी झाल्याचं गंभीरच्या स्मितहास्यातून दिसून आलं.

वेस्ट इंडिज विरुद्ध मिळालेल्या विजयानंतर लगेचच, संपूर्ण संघ आनंद साजरा करत होता, पण ज्याच्यामुळे हा विजय शक्य झाला, तो संजू एका कोपऱ्यात बसून पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोसत होता. स्क्रीनवर दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते.

2025 मध्ये, जेव्हा संजू फॉर्मसाठी संघर्ष करत होता आणि त्याला वर्ल्ड कप इलेव्हनमधून वगळण्यात आले, तेव्हा चारुलता हीच त्याचा सर्वात मोठा आधार होता. कालच्या या यशासाठी तिचा शांत, खंबीर आधार किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध केले.

कर्णधार सूर्यकुमार यादवने ज्या प्रकारे संजू सॅमसनचे कौतुक केले, ते कोणीच विसरून शकणार नाही. ईडन गार्डन्सवरील 60 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी एका सुरात संजूच्या नावाचा जयघोष केला. एकेकाळी सोशल मीडियावर "बेफिकीर" म्हणून ट्रोल झालेला हा खेळाडू आता भारतीय क्रिकेटचा नवा हिरो बनला आहे. संजूने अतिशय विनम्रतेनं आपलं हेल्मेट काढले आणि प्रेक्षकांसमोर डोके झुकवून त्यांचे प्रेम स्वीकारलं.

संजूने अतिशय विनम्रतेनं आपलं हेल्मेट काढले आणि प्रेक्षकांसमोर डोके झुकवून त्यांचे प्रेम स्वीकारलं. सामन्यानंतर, संजूने हातात तिरंगा धरला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक दृढनिश्चय होता.

त्याने सिद्ध केलं की तो फक्त एक प्रतिभाशाली खेळाडू नव्हे तर सामना जिंकवून देणारा उत्तम खेळाडू आहे. 1 मार्चची ही रात्र "संजू सॅमसन डे" बनली आणि आता 5 मार्चला तो वानखेडे येथे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यासाठी सज्ज आहे.