फक्त जिद्द पाहिजे, 50 वेळा रिजेक्ट झालं गाणं लताजींमुळे ठरलं ब्लॉकबस्टर, ऐकताच प्रत्येकजण गुनगुनतो

स्वतःच्या कलेवर विश्वास असेल तर यश नक्कीच मिळतं. 50 वेळा नाकारण्यात आलेलं गाणं, जेव्हा लताजींनी गायलं अन् काही क्षणात ते ठरलं ब्लॉकबस्टर. चित्रपटाने जिंकले होते 3 राष्ट्रीय पुरस्कार.

| Updated on: Apr 12, 2026 | 10:39 AM
1 / 5
भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीताचा इतिहास लता मंगेशकर या नावाशिवाय अपूर्णच मानला जातो. भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता दीदींनी आपल्या कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. त्यांच्या आवाजातलं गाणं म्हणजे ते हमखास हिट ठरणार असं एकेकाळी समीकरणच बनलं होतं.

भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीताचा इतिहास लता मंगेशकर या नावाशिवाय अपूर्णच मानला जातो. भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता दीदींनी आपल्या कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. त्यांच्या आवाजातलं गाणं म्हणजे ते हमखास हिट ठरणार असं एकेकाळी समीकरणच बनलं होतं.

2 / 5
मात्र त्यांच्या कारकिर्दीत एक असं गाणं आहे, ज्यामागची कहाणी अत्यंत रंजक आहे. सुरुवातीला तब्बल 50 वेळा नाकारण्यात आलेली हीच चाल पुढे भारतीय संगीतसृष्टीत इतिहास घडवणारी ठरली आणि या गाण्यामुळे तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

मात्र त्यांच्या कारकिर्दीत एक असं गाणं आहे, ज्यामागची कहाणी अत्यंत रंजक आहे. सुरुवातीला तब्बल 50 वेळा नाकारण्यात आलेली हीच चाल पुढे भारतीय संगीतसृष्टीत इतिहास घडवणारी ठरली आणि या गाण्यामुळे तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

3 / 5
ही गोष्ट आहे दिल तो पागल है या सुपरहिट चित्रपटातील. या चित्रपटाच्या वेळी एक वेगळीच घटना घडली. उत्तम सिंह जवळपास सात महिने यश चोप्रांच्या घरी संगीत बैठकीसाठी जात होते. प्रत्येक वेळी ते एकच धून वाजवायचे. तारा रा रा रा ररारा… ही धून ऐकून यश चोप्रा, आदित्य चोप्रा आणि पामेला चोप्रा अक्षरशः कंटाळले होते. त्यांना ही चाल काही खास वाटत नव्हती आणि ती वारंवार नाकारली जात होती.

ही गोष्ट आहे दिल तो पागल है या सुपरहिट चित्रपटातील. या चित्रपटाच्या वेळी एक वेगळीच घटना घडली. उत्तम सिंह जवळपास सात महिने यश चोप्रांच्या घरी संगीत बैठकीसाठी जात होते. प्रत्येक वेळी ते एकच धून वाजवायचे. तारा रा रा रा ररारा… ही धून ऐकून यश चोप्रा, आदित्य चोप्रा आणि पामेला चोप्रा अक्षरशः कंटाळले होते. त्यांना ही चाल काही खास वाटत नव्हती आणि ती वारंवार नाकारली जात होती.

4 / 5
ही धून अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिली. मात्र एके दिवशी उदय चोप्रा यांनी ती ऐकली आणि ते लगेचच म्हणाले, हे गाणं खूप मोठं हिट होईल. उदयच्या या एका प्रतिक्रियेमुळे सगळ्यांचं लक्ष त्या चालीकडे वळलं.

ही धून अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिली. मात्र एके दिवशी उदय चोप्रा यांनी ती ऐकली आणि ते लगेचच म्हणाले, हे गाणं खूप मोठं हिट होईल. उदयच्या या एका प्रतिक्रियेमुळे सगळ्यांचं लक्ष त्या चालीकडे वळलं.

5 / 5
यानंतर गीतकार आनंद बक्षी यांना बोलावण्यात आलं. त्यांनी धून ऐकल्यानंतर काहीही न बोलता थेट बाथरूममध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा हे गाणं नाकारलं जाईल, असं वाटत होतं. पण काही वेळातच ते बाहेर आले आणि त्यांच्या ओठांवर शब्द होते, अरे रे रे ये क्या हुआ, तूने ना पहचाना…. अवघ्या 10 मिनिटांत या गाण्याचे बोल तयार झाले.

यानंतर गीतकार आनंद बक्षी यांना बोलावण्यात आलं. त्यांनी धून ऐकल्यानंतर काहीही न बोलता थेट बाथरूममध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा हे गाणं नाकारलं जाईल, असं वाटत होतं. पण काही वेळातच ते बाहेर आले आणि त्यांच्या ओठांवर शब्द होते, अरे रे रे ये क्या हुआ, तूने ना पहचाना…. अवघ्या 10 मिनिटांत या गाण्याचे बोल तयार झाले.

Follow Us