
आशिया कप 2025 स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कारण 28 सप्टेंबरपर्यंत जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. एकुण आठ संघ सहभागी झाले असून पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. तर भारत पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला आहे. (Photo- ACC Twitter)

आशिया कप स्पर्धेसाठी आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई हे संघ आहेत. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि हाँगकाँग हे संघ आहेत. (Photo- ACC Twitter)

आशिया कप स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम यंदा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जेतेपद मिळवणाऱ्या संघाला 1 कोटी रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. त्यामुळे जेतेपद मिळवणाऱ्या संघाला 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे. (Photo- ACC Twitter)

आशिया कप टी20 संघाचं मागचं पर्व 2022 मध्ये पार पडलं होतं. तेव्हा या फॉर्मेटमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा श्रीलंकेला 1.6 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं होतं. उपविजेत्या पाकिस्तान संघाला 79.66 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे सुमारे 53 लाख आणि 39 लाख रुपये मिळाले होते. (Photo- ACC Twitter)

आशिया कप 2025 स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम 1.6 कोटी 2.6 कोटी करण्यात आली आहे. म्हणजेच एक कोटींची वाढ झाली आहे. तर उपविजेत्या संघाला 1.3 कोटी रुपये मिळतील अशी चर्चा आहे. तर मालिकेतील प्रत्येक संघाला 12.5 लाख रुपये बक्षिसी रक्कम मिळेल. (Photo- ACC Twitter)

टीम इंडियाला या वाढीव बक्षिसी रकमेचा तसा काहीच फायदा नाही. त्या मागे कारणंही तसंच आहे. भारतीय संघाने जेतेपद मिळवल्यानंतर कधीच बक्षिसाची रक्कम घेत नाही. हा पैसा खेळाडूंना वाटण्याऐवजी बीसीसीआय ही रक्कम आशियाई क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी दान करते. (Photo- ACC Twitter)