IND vs ZIM: दुसर्या विजयानंतर टीम इंडियाला मिळणार 2 चांगल्या बातम्या, इंग्लंडचा हिशेबही होणार पूर्ण!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी20 सामना होत आहे. मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडियाला हा विजय महत्त्वाचा आहे. जर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर दोन आनंदाच्या बातम्या मिळतील. अशा स्थितीत भारताला हा सामना जिंकणं भाग आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी20 सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. जर दुसरा सामना जिंकला तर मालिका खिशात घालेल. भारताला एक नाही तर दोन आनंदाच्या बातम्या या विजयानंतर मिळणार आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

भारताने दुसरा टी20 सामना जिंकला तर तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेईल. यासह भारताचा मालिका विजय होईल आणि तिसरा सामना फक्त औपचारिक राहिल. यासह कर्णधार श्रेयस अय्यरसाठी हा मालिका विजय खास असेल. त्याच्या नेतृत्वात भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय टी20 मालिका विजय असेल. (PHOTO CREDIT- PTI)

भारताने हा सामना जिंकल्यानंतर आयसीसी क्रमवारीत याचा लाभ मिळणार आहे. नुकतंच भारताला इंग्लंडकडून 4-0 ने मात मिळाली होती. त्यामुळे भारताचं अव्वल स्थान गेलं होतं. मात्र या विजयानंतर पुन्हा वैभव प्राप्त होईल. (PHOTO CREDIT- PTI)

झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ 268 या गुणांकनासह एकत्र होते. मात्र भारताने दुसरा टी20 सामना जिंकताच इंग्लंडच्या पुढे निघून जाईल. इंग्लंडला मागे टाकत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठेल. (PHOTO CREDIT- PTI)

या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 26 जुलैला खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलकडून नवी क्रमवारी जाहीर होईल. त्याला लाभ भारताला मिळणार यात काही शंका नाही. आयसीसी दर बुधवारी आयसीसी क्रमवारी जाहीर करते. (PHOTO CREDIT- PTI)