IPL 2026: मुंबई इंडियन्सला सहा पराभवानंतरही प्लेऑफची संधी, पण असं आहे समीकरण

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची नाजूक स्थिती आहे. दिग्गज खेळाडू असूनही आठ पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा आशा धूसर झाल्या आहे. पण अजूनही संधी आहे, कसं ते जाणून घ्या.

| Updated on: May 01, 2026 | 6:35 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून घसरली. त्यानंतर एक सामना जिंकला आणि पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून घसरली. त्यानंतर एक सामना जिंकला आणि पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. (Photo: IPL/BCCI)

2 / 5

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 14 पैकी 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे आता उर्वरित सहा सामन्यात प्लेऑफचं गणित सुटणार का? असा प्रश्न आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5

मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफची संधी आहे. कारण दोन विजयानंतर खात्यात 4 गुण आहेत. प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी हातात सहा सामने शिल्लक आहेत. पण सहा सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. तर आणि तरच 16 गुणांचं गणित सुटू शकते. कारण प्लेऑफसठी 16 गुण मानक मानला गेला आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5

मुंबई इंडियन्सने सहा पैकी सहा सामने जिंकले तर 16 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये जागा पक्की होईल. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी आता प्रत्येक सामना करो या मरोची लढाई असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या पुढच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5

मुंबई इंडियन्सचा सध्याचा फॉर्म पाहता सहा पैकी सहा सामने जिंकणं कठीण आहे. पण पाच सामने जिंकले तरी जर तर वर गणित सुटू शकतं. पण यासाठी मुंबई इंडियन्सला नेट रनरेट सुधारावा लागेल. कारण दोन संघांचे 14 गुण झाले तर शेवट नेट रनरेटवरच पुढचं गणित असेल. (Photo: IPL/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us