T20 WC: उपांत्य फेरीपूर्वी आयसीसीकडून संजू सॅमसनला गूड न्यूज, एकाच वेळी 25 फलंदाजांना धोबीपछाड
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यापूर्वी संजू सॅमसनला लय सापडली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या आनंदाला पारावर उरला नाही. असं असताना आयसीसीकडून संजू सॅमसन आणि त्याच्या चाहत्यांना गूड न्यूज मिळाली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा थरार रंगला असताना आयसीसीने खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना जबरदस्त फायदा झाल्याचं दिसून येत आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी टी20 क्रमावारीत आपला दबदबा ठेवला आहे. (Photo- ICC Twitter)

सुपर 8 फेरीच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसनची बॅट तळपली होती. त्याच्या नाबाद 97 धावांच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला नमवलं. या खेळीचा संजू सॅमसनला जबरदस्त फायदा झाला आहे. त्याची आयसीसी टी20 क्रमवारी सुधारली आहे. (Photo- ICC Twitter)

संजू सॅमसनने फलंदाजांच्या यादीत 65 व्या स्थानावरून थेट 40वं स्थान गाठलं आहे. म्हणजेच त्याने 25 फलंदाजांना या खेळीनंतर मागे टाकलं आहे. त्याचे रेटिंग प्वाइंट्स आता 549 झाले आहेत. आता उपांत्य आणि अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली तर त्याला नक्कीच फायदा होईल. (Photo- ICC Twitter)

भारताची ओपनर इशान किशन चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तिलक वर्मा सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानी आला आहे. सूर्यकुमार यादव सातव्या क्रमांकावर आहे. तर अभिषेक शर्माचं पहिलं स्थान कायम आहे. पण उर्वरित सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. (Photo- ICC Twitter)

गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह सातव्या स्थानी विराजमान झाला आहे. तर अर्शदीप सिंगने 6 गोलंदाजांना मागे टाकत 13वं स्थान गाठलं आहे. मिस्ट्री स्पिनर म्हणून ख्याती असलेला वरूण चक्रवर्ती पहिल्या स्थानी कायम आहे. (Photo- BCCI Twitter)