AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरल्याची किती ती खंत, किती तो कहर आणि किती आदळआपट, पाकिस्तानात ‘भूकंप’, बाबर आझमवर अविश्वास?

पाकिस्तानचा संघ हरल्याचं खापर पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यावर फोडलं जातंय. पाकिस्तानचा हा चाललेला अतितयपणा काही नवा नाही. बाबर आझमवर अविश्वास दाखवला जातोय. सविस्तर वाचा...

हरल्याची किती ती खंत, किती तो कहर आणि किती आदळआपट, पाकिस्तानात 'भूकंप', बाबर आझमवर अविश्वास?
बाबर आझम, कर्णधार, पाकिस्तान क्रिकेट संघImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 30, 2022 | 11:01 PM
Share

नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) भारताकडून पाकिस्तानला (IND vs PAK) पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानात आदळापट सुरू झाली. पाकिस्तानच्या काही पराभव पचनी पडेना.  कुठे वेगवेगळे वक्तव्य केले जाऊ लागले, तर अनेक ठिकाणी वेगळेच व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाले. यात आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानचा संघ हरल्याचं खापर पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्यावर फोडलं जातंय. पाकिस्तानचा हा चाललेला अतितयपणा काही नवा नाही. पण, अलिकडेच आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानात बाबर आझमवर अविश्वास दाखवला जातोय. त्यामुळे सोशल मीडियावर देखील याची चांगलीच चर्चा. पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलंय याविषयी अधिक जाणून घ्या..

T20 विश्वचषकात रिझवान आणि बाबर आझम या सलामीच्या जोडीनं एकट्यानं 152 धावा केल्या. रिझवान आणि बाबर ही जोडी हिट ठरेल, पण, ही जोडी सलामीला जाऊ नये, असं संघाच्या माजी प्रशिक्षकाला वाटते.

तो योग्य निर्णय नाही?

बाबर-रिझवान जोडीला सलामी देणे हा पाकिस्तानसाठी योग्य निर्णय का नाही, असं संघाचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सांगितलं. तो म्हणाला, ‘फखर जमानला ओपनला पाठवले पाहिजे जेणेकरून डावे-उजवे संयोजन होईल. यामुळे गोलंदाजांना वेगवेगळ्या कोनातून गोलंदाजी करावी लागणार आहे. यानंतर रिझवान किंवा बाबर तिसर्‍या क्रमांकावर आले जेणेकरून फलंदाजीला अधिक खोली मिळेल. यापैकी एक अँकर भूमिका घ्या आणि बाकीचे त्याच्या आसपासच रहा. ते पुढे म्हणाले, ‘मला वाटते हे योग्य आहे. फखर वेगवेगळ्या कोनातून चेंडू खेळतो, ज्यामुळे गोलंदाज अस्वस्थ होतो.

पाकिस्तानची कमजोरी सांगितली

आर्थरने संघाच्या मधल्या फळीला कमकुवतपणा म्हटले. तो म्हणाला, ‘पाकिस्तानसोबत असताना टी-20मध्ये टीम सर्वात यशस्वी ठरली होती. आम्ही प्रथम फलंदाजी करताना 160 धावा करण्याचा प्रयत्न करायचो आणि त्यानंतर त्या धावसंख्येचा बचाव करण्याची जबाबदारी गोलंदाजांची होती. तो काळ आमच्यासाठी चांगला होता. तेव्हाच्या आणि आताच्या संघात फरक आहे तो मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिकमुळे. सध्या संघाच्या मधल्या फळीतील खेळाडू खूपच तरुण आहेत आणि त्यांच्याकडे अनुभव नाही. म्हणूनच तुमच्या पहिल्या दोन-तीन विकेट पडल्या की तो धडपडायला लागतो.

संघाचे कौतुक केले

आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव होऊनही माजी क्रिकेटपटूंनी आपल्या संघाचे कौतुक केले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खान म्हणाला, “दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सामन्यापूर्वी एकमेकांबद्दल खूप आदर दाखवला ज्यामुळे भारताकडून पराभव पत्करावा लागला तरी संघावर टीका होऊ नये आणि आमचा संघ शेवटच्या षटकापर्यंत युद्ध करत राहिला. कराचीमध्येही सामना पाहण्यासाठी जागोजागी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. माजी कसोटी फिरकीपटू इक्बाल कासिम म्हणाला, हा एक चांगला सामना होता आणि अगदी जवळचाही होता. शाहीन शाह आफ्रिदीशिवायही पाकिस्तानी संघाने चमकदार कामगिरी केली. आम्ही चौथ्या वेगवान गोलंदाजाला मुकलो.

Follow Us
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या!लवकरच मोठा फेरबदल? प्रदेशाध्यक्ष...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या! लवकरच मोठा फेरबदल? प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षच...
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?