
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नवा विजेता मिळतो की गतविजेता भारतच जेतेपदावर नाव कोरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड दिसत आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ कोणता? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. चला तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात. (Photo: Asian Cricket)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान टीम इंडियाला मिळाला आहे. भारताने आतापर्यंत 36 सामने जिंकले आहेत. तर दोन जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात भारताने एकही सामना गमावला नव्हता. भारताची विजयी टक्केवारी ही 70.6 टक्के आहे. (Photo: BCCI Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचं नाणं खणखणीत वाजलं आहे. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 61.1 टक्के आहे. या स्पर्धेत 33 विजय मिळवले आहे. तिसऱ्या स्थानावर 32 विजयासह दक्षिण अफ्रिकेचा संघ आहे. तर ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले असून चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी 63 टक्के आहे. (Photo: Srilanka Cricket Twitter)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने 30 सामने जिंकले असून विजयी टक्केवारी 58.8 टक्के आहे. इंग्लंडने 28 विजय मिळवले आहेत. तर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजने 25-25 विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे न्यूझीलंडने भारताविरुद्ध टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. (Photo: ICC Twitter)

अफगाणिस्तान-बांगलादेशने 12-12 विजय, नेदरलँडने 10 विजय, झिम्बाब्वेने 8 विजय, आयर्लंड-स्कॉटलँडने 7-7 विजय आणि नामिबियाने 5 विजय मिळवले आहेत. नेपाळ आणि अमेरिकेच्या वाटेला प्रत्येकी 2 विजय आले आहेत. तर कॅनाडा, हाँगकाँग, यूगांडा आणि युएईने प्रत्येकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: ICC Twitter)