ऐश्वर्या रायमुळे सलमान खान संजय लीला भंसालींवर भडकलेला, नेमकं काय घडलेलं? ऐकून तुम्ही…

ऐश्वर्या रायमुळे अभिनेता सलमान खान संजय लीला भंसाली यांच्यावर भडकला होता. थेट विचारलेला प्रश्न. नेमकं काय घडलेलं?

| Updated on: Jun 19, 2026 | 5:56 PM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या प्रेमकथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाला 18 जून 2026 रोजी 27 वर्षे पूर्ण झाली. 18 जून 1999 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या प्रेमकथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाला 18 जून 2026 रोजी 27 वर्षे पूर्ण झाली. 18 जून 1999 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

2 / 5
चित्रपटात सलमान, ऐश्वर्या आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सलमान आणि ऐश्वर्या यांची ऑनस्क्रीन प्रेमकथा प्रेक्षकांना खूप भावली होती. मात्र चित्रपटाच्या शेवटी नंदिनी ही समीरऐवजी आपल्या पती वनराजसोबत राहण्याचा निर्णय घेते, ज्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला होता.

चित्रपटात सलमान, ऐश्वर्या आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सलमान आणि ऐश्वर्या यांची ऑनस्क्रीन प्रेमकथा प्रेक्षकांना खूप भावली होती. मात्र चित्रपटाच्या शेवटी नंदिनी ही समीरऐवजी आपल्या पती वनराजसोबत राहण्याचा निर्णय घेते, ज्यामुळे अनेक चाहत्यांना धक्का बसला होता.

3 / 5
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा त्या काळात मोठ्या प्रमाणावर होती. अभिनेत्री स्मिता जयकर यांनी एका मुलाखतीत सांगितलेल्या आठवणींनुसार, ‘आंखों की गुस्ताखियां’ या गाण्याच्या शूटिंगवेळी एक मनोरंजक प्रसंग घडला होता.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यात जवळीक वाढल्याची चर्चा त्या काळात मोठ्या प्रमाणावर होती. अभिनेत्री स्मिता जयकर यांनी एका मुलाखतीत सांगितलेल्या आठवणींनुसार, ‘आंखों की गुस्ताखियां’ या गाण्याच्या शूटिंगवेळी एक मनोरंजक प्रसंग घडला होता.

4 / 5
स्मिता जयकर यांच्या म्हणण्यानुसार, एका सीनचे स्पष्टीकरण देताना संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्या राय यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या हाताला स्पर्श केला. हे पाहून सलमान खान नाराज झाला आणि त्याने भन्साळींना तुम्ही तिला कसे स्पर्श केले? असा प्रश्न विचारल्याचे सांगितले जाते.

स्मिता जयकर यांच्या म्हणण्यानुसार, एका सीनचे स्पष्टीकरण देताना संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्या राय यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या हाताला स्पर्श केला. हे पाहून सलमान खान नाराज झाला आणि त्याने भन्साळींना तुम्ही तिला कसे स्पर्श केले? असा प्रश्न विचारल्याचे सांगितले जाते.

5 / 5
या घटनेनंतर वातावरण पुन्हा सामान्य झाले, मात्र सलमानची ऐश्वर्याबाबतची काळजी स्पष्टपणे दिसून आल्याचे स्मिता जयकर यांनी नमूद केले होते. 27 वर्षांनंतरही ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट, त्यातील गाणी, कलाकारांची अभिनयशैली आणि पडद्यामागील किस्से यांमुळे चर्चेत राहिला आहे.

या घटनेनंतर वातावरण पुन्हा सामान्य झाले, मात्र सलमानची ऐश्वर्याबाबतची काळजी स्पष्टपणे दिसून आल्याचे स्मिता जयकर यांनी नमूद केले होते. 27 वर्षांनंतरही ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट, त्यातील गाणी, कलाकारांची अभिनयशैली आणि पडद्यामागील किस्से यांमुळे चर्चेत राहिला आहे.

Follow Us