AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही तुमचा Aadhaar App पिन विसरलात का? घरबसल्या फक्त ‘या’ 5 सोप्या स्टेप्स फॉलो करून नवीन PIN करा सेट

आधार ॲपच्या सुरक्षिततेसाठी आपला पिन वेळोवेळी बदलणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमचा पिन विसरलात, तर आता चिंता करण्याची गरज नाही. कारण घरबसल्या अगदी या 5 स्टेप्सच्या मदतीने नवीन पिन सेट करू शकता. चला तर मग या स्टेप्स जाणून घेऊयात.

तुम्ही तुमचा Aadhaar App पिन विसरलात का? घरबसल्या फक्त 'या' 5 सोप्या स्टेप्स फॉलो करून नवीन PIN करा सेट
| Edited By: | Updated on: Aug 08, 2026 | 3:46 PM
Share

आजच्या युगात कोणतेही काम असो आधार कार्ड आपल्या प्रत्येकाजवळ असणे खूप महत्वाचे आहे. आपली ओळख दाखवण्यासाठी आधारकार्ड हे एक प्रुफ आहे. तसेच आजच्या डिजिटल काळात प्रत्येकजण फोनमध्ये आधार ॲपचा वापरत करत आहे. अशातच तुमच्या आधार ॲपची सुरक्षा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची आधार-संबंधित वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी आणि त्या महितीचा गैरवापर टाळता यावा, यासाठी ॲपचा पिन वेळोवेळी बदलला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आधार ॲपचा पिन कसा बदलायचा हे माहीत नसेल तर चिंता करू नका. कारण आता तुम्ही घरबसल्या काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने आधार पिन अपडेट करू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण आधार पिन अपडेट करण्याची सोपी स्टेप्स जाणून घेऊयात.

आधार ॲपचा पिन बदलण्याचे 5 सोप्या स्टेप्स

सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये आधार ॲप उघडा आणि जुन्या पिनच्या मदतीने लॉग इन करा.

लॉग इन केल्यानंतर अॅपच्या प्रोफाइल किंवा सेटिंग्ज विभागात जा. येथे तुम्हाला सुरक्षेशी संबंधित पर्याय मिळतील.

आता ‘Change PIN’ किंवा ‘Update PIN’ या पर्यायावर क्लिक करा.

सर्वप्रथम तुमचा जुना पिन टाका. त्यानंतर तुमचा नवीन पिन टाका आणि तोच पिन पुन्हा टाकून त्याची पुष्टी करा.

आता सबमिट किंवा सेव्ह बटणावर टॅप करा. पिन यशस्वीरित्या बदलल्यानंतर त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल. पुढच्या वेळी आधार ॲप उघडल्यावर तुम्हाला नवीन पिन वापरावा लागेल.

तुम्ही तुमचा पिन विसरल्यास काय करावे?

तुम्ही तुमचा आधार ॲप पिन विसरला असाल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ॲपमधील ‘Forgot PIN’ या पर्यायाचा वापर करून नवीन पिन तयार करू शकता. यासाठी ओटीपी पडताळणी आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की ओटीपी तुमच्या आधार कार्डशी जोडलेल्या त्याच मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.

आधार ॲपचा पिन बदलणे का आवश्यक आहे?

आधार ॲप आधारशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवते. तुमचा फोन हरवल्यास किंवा कोणाला तुमचा पिन कळल्यास, तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते.

त्यामुळे तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी वेळोवेळी तुमचा पिन बदलणे ही एक चांगली सवय आहे. यामुळे तुमचे आधार ॲप अधिक सुरक्षित राहते आणि गैरवापराचा धोका कमी होतो.

Follow Us
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक