Aamir Khan Third Marriage : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला रिना दत्ता, किरण राव का आल्या नाहीत? जवळच्या मित्राने सांगितलं सत्य
Aamir Khan Third Marriage : अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट 5 जुलै रोजी विवाहाच्या नात्यात अडकले. आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे. आमिरचं हे लग्न त्याच्या घरीच झालं. यावेळी जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

फोटो आणि व्हिडिओमध्ये आमिर खानच्या पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव दिसल्या नाहीत. रिना दत्ता आणि किरण राव कुठे दिसल्या नाहीत, म्हणून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. आता दोघींच्या अनुपस्थितीवर आमिर खानच्या मित्राने खुलासा केला आहे.

आमिर खानचा मित्र आणि लगान चित्रपटातील अभिनेता अमीन हाजी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला उपस्थित होता. त्याने रेडिफ डॉट कॉमशी बोलताना सांगितलं दोघी का आल्या नाहीत, त्या बद्दल सांगितलं.

आमिरच्या तिसऱ्या लग्नावेळी किरण राव देशाबाहेर होती. किरण राव त्यावेळी युनायटेड किंगडममध्ये होती. दुसऱ्या विवाहापासून असलेला मुलगा आजाद लग्नासाठी परदेशातून भारतात आलेला.

रिना दत्ताच्या अनुपस्थितीवर अमीन हाजी म्हणाला की, "काहींची अनुपस्थिती स्वाभाविक असते. कधी, कधी लोकांना स्पेस देणं हे प्रेम आणि सन्मान देण्याचा भाग असतो. इतक्या महत्वाच्या प्रसंगी कोणाला असहज वाटू नये, अशी सुद्धा त्यामागे भूमिका असते"

भले त्या दोघी लग्नाला हजर नसतील पण आमिर खानचे रिना दत्ता आणि किरण राव सोबत चांगले संबंध आहेत, असं अमीन म्हणाला. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आमीर, सत्यजित भटकल, किरण आणि रिना प्रोफेशनली एकत्र काम करतात.