AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीने बदलला फॉर्मेट, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत इतक्यांदा येणार आमनेसामने

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असताना आयसीसीने फॉर्मेट बदलला आहे. या स्पर्धेत आता सुपर 7 फेरी असणार आहे. त्यामुळे उत्सुकता तर वाढणार आहे. पण नेमका काय बदल केला? ते जाणून घ्या.

भारत पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीने बदलला फॉर्मेट, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत इतक्यांदा येणार आमनेसामने
भारत पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीने बदलला फॉर्मेट, वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत इतक्यांदा येणार आमनेसामनेImage Credit source: Daniel Pockett-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Jul 15, 2026 | 9:07 PM
Share

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेबाबत एक मोठा निर्णय घेत क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. मागच्या दोन वर्ल्डकप स्पर्धेत फक्त 10 संघ खेळले होते. त्यामुळे ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळली गेली. यात टॉप चार असलेल्या संघांना उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळत होती. पण या फॉर्मेटमध्ये आता बदल झाला आहे. जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसीच्या बैठकीत पुरूष वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं स्वरूप बदललं आहे. त्यानंतर नव्या फॉर्मेटची जोरदार चर्चा रंगली आहे. या निर्णयामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आयसीसीवर टीकास्त्र सोडलं आहे. भारत पाकिस्तान सामने जास्तीत जास्त खेळले जावे, यासाठी हा बदल केला असल्याचा आरोप केला आहे. पण हा प्रश्न किंवा आरोप होण्याचं नेमकं कारण काय? याबाबत सविस्तर समजून घेऊयात

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत एकूण 14 संघ भाग घेणार आहेत. त्यामुळे 2003 सारखा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता होती. सात संघांचे दोन गट आणि त्यानंतर सुपर 6 फेरी होईल. त्यातून उपांत्य फेरीचे चार संघ निवडले जातील. पण आयसीसीने या फॉर्मेटला बगल दिली आहे.

आता 14 पैकी फक्त 12 संघ मुख्य राउंडमध्ये जातील. तसेच सहा संघांचे दोन गट असतील. यापैकी टॉप 3 संघ सुपर 7 फेरीत जागा मिळवतील. तर उर्वरित एक म्हणजे सातवा संघ हा दोन्ही ग्रुपमधील चौथा बेस्ट संघ असेल. या फेरीत सर्व संघ एकमेकांशी सामना करतील. त्यातून टॉप 4 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.

भारत पाकिस्तान सामने वाढणार

मागच्या दोन वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात जास्तीत जास्त दोन सामने खेळण्याची शक्यता होती. पण तसं काही घडलं नाही. कारण पाकिस्तान दोन्ही वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरीतूनच बाद झाला होता. त्यामुळे आयसीसी आणि ब्रॉडकास्टरला आर्थिक फटका बसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना अधिकाअधिक व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नव्या फॉर्मेटमुळे सामन्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सुपर 12 राउंड म्हणजेच ग्रुप फेरीत भारत आणि पाकिस्तान एका गटात असतील, तर एक सामना होईल. शक्यतो या दोन संघांना एकाच गटात ठेवलं जात असल्याचं मागच्या स्पर्धांमधून दिसून आलं आहे. आता राउंड 7 मुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ समोरासमोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फेरीत आणखी एक सामना होईल. जर दोन्ही संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचले, तर अंतिम फेरीत भिडतील. पण थेट उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आलं. तर मात्र उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी तिसऱ्यांदा आमनासामना होईल. त्यामुळे एकाच स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होतील आणि त्याचा थेट फायदा ब्रॉडकास्टरला होईल.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

‘देवा’च्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर, भाजपाच्या बड्या नेत्याने वात पेटवली; म्हणाले… तर जनता नेत्यांवर विश्वास ठेवणार नाही.

‘देवा’च्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर, भाजपाच्या बड्या नेत्याने वात पेटवली; म्हणाले… तर जनता नेत्यांवर विश्वास ठेवणार नाही

IMD Rain Update : 21 जुलैची तारीख लिहून ठेवाच! धो धो पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार, नदी-नाले तुडूंब भरणार!.

IMD Rain Update : 21 जुलैची तारीख लिहून ठेवाच! धो धो पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार, नदी-नाले तुडूंब भरणार!

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंद होईल, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली इच्छा.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंद होईल, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली इच्छा

बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ.

बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ

दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार, शासनादेश जारी.

दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी केली जाणार, शासनादेश जारी