AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डी लोकसभेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच ? तिडा सुटणार का ?

शिर्डीच्या जागेवरून महा विकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच उध्दव ठाकरे दोन दिवसीय शिर्डी लोकसभेच्या दौऱ्यावर येत असल्याने या जागेवर ते आपली दावेदारी अधिक प्रबळ करतात की काँग्रेसला ही जागा मिळविण्यात यश मिळते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

शिर्डी लोकसभेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच ? तिडा सुटणार का ?
balasaheb thorat and uddhav thackerayImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 14, 2024 | 2:58 PM
Share

शिर्डी | 14 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूका केव्हाही घोषीत होऊ शकतात. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. अनेक पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची घोषणा देखील सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे अनेक जागांवर एकमत झाले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शिर्डी लोकसभेच्या जागेवर अद्यापही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. कधी काळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभेच्या जागेवरून उध्वव बाळासाहेब ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम केव्हाही वाजतील अशी स्थिती आहे. महायुतीच्या विरोधात कॉंग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 48 जागांवर बोलणी जवळपास झाली असून अनेक जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र नगर येथील शिर्डी लोकसभा जागा अद्याप कोणाला सोडायची हे निश्चित झालेले नाही. या जागेवरुन कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात समेट झालेला नसल्याचे म्हटले जात आहे. कॉंग्रेसचा शिर्डी एकेकाळी बालेकिल्ला होता. आता शिर्डीतून कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन दोन्ही पक्षांत बोलणी सुरु आहेत.

उद्धव ठाकरे यांचा दौरा

उध्दव ठाकरे 13 आणि 14 फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या शिर्डी लोकसभा मतारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही गटाकडून शिर्डीच्या उमेदवारीवर दावा केला जात आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. तरी देखील ठाकरे गटाने शिर्डीच्या जागेवर दावा कायम ठेवला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करीत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी निश्चित मानून वाकचौरे गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. 2009 साली वाकचौरे यांनी शिर्डी मतदासंघांत रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यामुळे जनता पुन्हा माझ्यामागे उभी राहिल असा विश्वास भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेसचा ही प्रबळ दावा

काँग्रेस देखील गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवित आली आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र असले तरी काँग्रेसने देखील शिर्डी लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. काँग्रेसच्या निष्ठावान आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यादेखील गेल्या काही दिवसांपासून शिर्डी लोकसभे अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढीत आहेत. घरोघरी जाऊन उत्कर्षा रूपवते नागरिकांशी संवाद साधत असून काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानून त्या कामाला लागल्या आहेत. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी शिर्डी लोकसभेत काँग्रेसला अनुकूल वातावरण असून आम्ही या जागेसाठी आग्रही असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.