AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray : होय, ते गद्दारच, त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल सुरूच

Aaditya Thackeray : आजचा उत्साह बघून एवढंच बोलतो हेच खरं शिवसेनेचं प्रेम आहे. गेलं महिनाभरापासून दुःखदायक वातावरण आहे. हे विसरण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढली आहे. तुम्हाला शिवसैनिकांना भेटण्यासाठी ही यात्रा काढली आहे. ज्यांना आपण पुढे आणलं, ओळख दिली.

Aaditya Thackeray : होय, ते गद्दारच, त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल सुरूच
होय, ते गद्दारच, त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल सुरूचImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2022 | 7:40 PM
Share

भिवंडी: शिवसेनेत (shivsena) फूट पडल्यापासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी बंडखोरांवरील टीका सुरूच ठेवली आहे. आदित्य ठाकरे यांनी टीका करणं योग्य नसल्याचं बंडखोर वारंवार सांगत असतानाही आदित्य ठाकरेंकडून विरोधकांवर टीका सुरूच आहे. आजही त्यांनी भिवंडीत (bhiwandi) शिवसेनेच्या एका मेळाव्याला संबोधित करताना बंडखोरांवर टीका केली. त्यांनी बंड केलं नाही. उठाव केला नाही. तर गद्दारी केली आहे, असं सांगतानाच शिवसेनेतून जे गेले ते गद्दारच आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच लाज असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवा, असं आव्हान देतानाच हे सरकार जास्त काळ चालणार नाही. दोन लोकांचं मंत्रिमंडळ आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे लिहून घ्या, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी याची शिवसंवाद यात्रा भिवंडीत पोहोचली. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी असताना यांनी गद्दारी करत सत्ता मिळवली, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उभे होते. काही झाले तरी आम्ही ठाकरे कुटुंबासोबतच राहू असा निर्धारच या शिवसैनिकांनी यावेळी केला.

तो विश्वास नाही, अंधविश्वास होता

मागच्या अडीच वर्षात आपलं सरकार असताना कोणताही धार्मिक भेदभाव न करता, जातीपातीचं राजकारण न करता विकासाची कामं करत आलो. महाराष्ट्राची 24 तास सेवा करत आलो. राजकारण कमी केलं ही आपली चूक झाली. आपण कधी राजकारण केलं नाही, सत्तेत असताना कधी विरोधकांना त्रास दिला नाही. स्वतःच्या आमदार, खासदारांवर नजर ठेवली नाही. ठेवला तो विश्वास आणि तो अंधविश्वास होता. तोच आज धोका देऊन गेला आहे. जे गेलेत त्यांच्यात शिवसेना कधीच नव्हती, त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. ते बोलतात आम्ही उठाव केला, बंड केलं. पण त्यांनी गद्दारी केली, हा उठाव नाही. ते गद्दार आज उजळ माथ्याने फिरत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

गद्दारी पटणारी आहे का?

आजचा उत्साह बघून एवढंच बोलतो हेच खरं शिवसेनेचं प्रेम आहे. गेलं महिनाभरापासून दुःखदायक वातावरण आहे. हे विसरण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढली आहे. तुम्हाला शिवसैनिकांना भेटण्यासाठी ही यात्रा काढली आहे. ज्यांना आपण पुढे आणलं, ओळख दिली, मंत्रिपदं दिली. पण ते आपल्याला सोडून गेले. गद्दारी केली. हे तुम्हाला तरी पटणारं आहे का? जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते राजकारण म्हणून तुम्हाला पटणारं आहे का? असा सवाल त्यांनी केला.

निष्ठावंत आमच्यासोबत

यांना काय कमी केलं? कुटुंबाप्रमाणे वागवलं. आपली महिला आघाडी आहे, युवासेना आहे. सगळे आहेत. शिवसेना हललेली नाही, हलले आहेत ते ज्यांना अपचन झालं. ठाणे, पालघर, भिवंडीमध्ये ज्यांना जे जे देऊन बसलो, ते मस्त तिकडे आरामात बसले आहेत. त्या लोकांचं ऐकून आम्ही ज्यांच्यावर अन्याय केला ते निष्ठावंत लोक आमच्यासोबत आहेत, असंही ते म्हणाले.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय