AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिपू सुलतानचा वाद, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची कोंडी, हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीची वडिलांसाठी भावुक पोस्ट

सध्या राज्यात टिपू सुलतानवरून चांगलाच वाद पेटला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीपू सुलतानबाबत बोलताना मोठं विधान केलं होतं, त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

टिपू सुलतानचा वाद, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची कोंडी, हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीची वडिलांसाठी भावुक पोस्ट
harshwardhan sapkalImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 16, 2026 | 6:55 PM
Share

मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता, यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं. हिंदूत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या, दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं होतं.   ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात भाजप चांगलंच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. अनेक ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात आंदोलन देखील करण्यात आले. पुण्यात भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये जोरदार राडा देखील झाला.

दरम्यान त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांची मुलगी गार्गी सपकाळ यांनी आपल्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली आहे. गार्गी सपकाळ या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कन्या आहेत, त्या लंडन स्थित एका महाविद्यालयात पब्लिक हेल्थवर शिक्षण घेत आहेत. सोबतच दवा आणि दुवा प्रकल्प देखील राबवीत आहेत. गार्गी सपकाळ यांनी आपल्या वडिलांच्या समर्थनार्थ एक भावनिक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. ” सत्य ओळखा आणि सत्याच्या बाजूने एकजुटीने उभे राहा, खऱ्या स्वराज्यासाठी एकत्र लढा.. ”  असं आव्हान गार्गी सपकाळ यांनी आपल्या या पोस्टमधून केलं आहे.  सध्या गार्गी सपकाळ यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

नेमकं काय म्हणाल्या गार्गी सपकाळ? 

” सत्य ओळखा आणि सत्याच्या बाजूने एकजुटीने उभे राहा, खऱ्या स्वराज्यासाठी एकत्र लढा.. ” असं आव्हान गार्गी सपकाळ यांनी केलं आहे. पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, खरतर माझ्या वडिलांचं विधान अगदी स्पष्ट आणि संदर्भासहीत होतं. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे, टिपू सुलतानने महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन काम केलं. शिवरायांच्या विचाराप्रमाणेच टिपू सुलतानने कोणत्याही विखारी विचारांना पाठिंबा दिला नाही, असा त्यांच्या विधानाचा हेतू होता असं गार्गी सपकाळ यांनी म्हटलं आहे.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?