AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटक सीमाप्रश्नावर सरकारची भूमिका काय? मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं…

अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषद, कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य...

कर्नाटक सीमाप्रश्नावर सरकारची भूमिका काय? मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 10, 2022 | 3:22 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Simavad) दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. त्यावर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मात्र याबाबत मौन बाळगण्यात आल्याने विरोधीपक्षाकडून टीका होत आहे. यावर मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) बोलते झालेत. त्यांनी सरकारची भूमिका काय हे सांगितलं आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अनेक वर्षापासून सुरू आहे.मराठी माणसाची अडवणूक करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाहीत . दोन्ही राज्यात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सर्व खासदार केंद्राकडे आपलं म्हणणं मांडणार आहेत. केंद्राने तातडीने तोडगा काढणं आवश्यक आहे, असं सत्तार म्हणालेत.

आपल्या राज्याच्या मागणीनुसार केंद्र सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे. कर्नाटक सरकारने अडवणूक करू नये. केंद्र सरकारचं म्हणणं लक्षात घ्यायला हवं. कर्नाटक सरकारच्या अशा वागणुकीला कुणीही थारा देणार नाही. कर्नाटक विषयावर सर्वांनी एकत्रित येणं आवश्यक आहे. सर्व पक्ष एकत्रित आले तर केंद्रदेखील महाराष्ट्राची मागणी आवश्य लक्षात घेईल, असं सत्तार यांनी म्हटलंय.

मराठी भाषिक आपले असून कोणावरही अन्याय होणार आम्ही. अमित शाह यांनी पुढाकार घेऊन लक्ष द्यावं. कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही काळजी घ्यावी आणि कोणावर कारवाई करतांना कायदेशीर असावी आणि ज्यांनी कुणावरही अन्याय होऊ देणार नाहीत, असं सत्तार म्हणालेत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसत आहे आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचंच. ते आक्रमकपणे त्यांची बाजू मांडत आहे. पण आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? ते काहीही का बोलत नाहीत? त्यांच्या तोंडाला कुलुप का?, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला. त्यानंतर मंत्री सत्तार यांनी सरकारची बाजू मांडली आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?