राजकुमाराऐवजी राजकन्या भाग्यश्री यांनी घेतला आरतीचा मान, राजे संतापले, नेमकं काय घडलं?

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबातील वाद पेटला असल्याचे दिसत आहे. आगमन सोहळ्याच्या अगोदर मुख्य मंदिरात भाग्यश्री पटवर्धन यांनी आरतीचा मान घेतल्यानंतर मोठा वाद झाला आहे.

राजकुमाराऐवजी राजकन्या भाग्यश्री यांनी घेतला आरतीचा मान, राजे संतापले, नेमकं काय घडलं?
Bhagyashree Patwardhan
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 7:47 AM

शंकर देवकुळे, प्रतिनिधी: सांगलीचे आराध्य दैवत गणपती बाप्पा असून सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी पदावरून आता सांगलीचे राजे पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता आहॆ. आज सकाळी गणपती मंदिरात अभिनेत्री राजकन्या भाग्यश्री यांनी नूतन युवराज आदित्यराजे यांना डावलत गणपती मंदिरात आरती केल्याने वादाला सुरुवात झाली आहे. यावेळी मी वारसदार असल्याचा दावा करत अभिनेत्री भाग्यश्री यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन उत्सव मूर्तीची आरती केली. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली असून सांगली गणपती पंचायतन संस्थानाच्या उत्तराधिकारी कोण यावरून पटवर्धन कुटुंबातील वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाग्यश्री यांनी घेतला मान

भाग्यश्री पटवर्धन यांनी सकाळीच सांगलीचे मुख्य गणपती मंदिर गाठत मंदिराच्या गाभाऱ्यात ठिय्या मारला. यावेळी प्रतिष्ठापना करण्यासाठी उत्सव मूर्ती दरबार हॉलकडे जाण्यासाठी आरती करण्यात येणार होती. यासाठी नूतन युवराज आदित्य राजे पटवर्धन यांना बोलवण्यात आले. मात्र त्यांना थांबवत भाग्यश्री यांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश केला आणि आरती केली. या प्रकारमुळे सर्वजण अचंबित झाले. तसेच राजेंची तब्यत बरी नसते त्यामुळे आपल्या मुलांपैकी कोणीही यावे आणि आरती करावी असे त्यांनी सांगितल्याचे भाग्याश्री म्हणाल्या.

राजे संतापले आणि दिले स्पष्टीकरण

दरम्यान, या घटनेमुळे राजेसाहेब विजयसिंह पटवर्धन चांगलेच संतप्त झाले. मी राजा या नात्याने आदित्य पटवर्धन यांना राजकुमार म्हणून जाहीर केले आहॆ. त्यामुळे यापुढे आदित्य राजेच संस्थांनाचे पुढचे राजे असणार आहेत. युवराजांना थांबवून भाग्यश्री यांनी आरती करणे आणि लोकांना घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात घुसणे योग्य नसल्याचे राजे विजयसिह पटवर्धन यांनी स्पष्ट केले. त्यांना असे करण्याचा अधिकार नसल्याचे विजयसिंह राजे पटवर्धन यांनी स्पष्ट सांगितले आहॆ. त्यामुळे भाग्यश्री आणि पती हिमालय यांच्याशी संस्थानांच्या मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार न करण्याचे आवाहन राजे साहेबांनी केले आहॆ. आणि आदित्य राजे पटवर्धन हेच संस्थांनाचे उत्तराधिकारी असतील आणि सांगलीकर जनतेने त्यांना साथ द्यावे असे आवाहन केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us