AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही, अडीच वर्षाचा फॉर्म्युला नकोच : मित्रपक्ष

भाजप-शिवसेनेची मुख्यमंत्रिपदावरुन (Aditya Thackeray chief minister post) खेचाखेची सुरु असताना, तिकडे मित्रपक्षांनी बैठक घेऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही, अडीच वर्षाचा फॉर्म्युला नकोच : मित्रपक्ष
| Edited By: | Updated on: Oct 31, 2019 | 1:02 PM
Share

मुंबई : भाजप-शिवसेनेची मुख्यमंत्रिपदावरुन (Aditya Thackeray chief minister post) खेचाखेची सुरु असताना, तिकडे मित्रपक्षांनी बैठक घेऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत. पाच वर्षांसाठी तेच मुख्यमंत्री(Aditya Thackeray chief minister post) असावेत, तसंच मित्रपक्षांना मंत्रिपदं द्या, अशी मागण्या रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

युतीतील घटक पक्षांचे नेते रामदास आठवले, अविनाश महातेकर, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांची बैठक झाली. या बैठकीनंतर रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत घटकपक्षांच्या मागण्या मांडल्या.

“आमचा पक्ष, जानकर यांचा पक्ष, सदाभाऊ खोत आम्ही सर्व भाजपसोबत आहोत. आम्हाला दोन मंत्रिपदे मिळाली होती. शेवटी शेवटी आरपीआयला मंत्रिपद मिळालं. विनायक मेटे यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं, त्यामुळे सर्व मित्रपक्षांच्या वाट्याला मंत्रिपद यावं”, असं आठवले म्हणाले.

“आता निवडून येण्याचं प्रमाण जास्त आहे. कोणताच पक्ष 100 च्या पुढे गेला नव्हता. पण भाजप 100 च्या वर गेला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्व धुरा होती. काल देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड झाली आहे. त्याचा ठरावही केला आहे. आता उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकरात निर्णय घ्यावा”, असं रामदास आठवले यांनी नमूद केलं.

“आम्हाला चारही पक्षांना मंत्रिपद मिळावीत. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांना भेटणार आहोत. चौघांना मंत्रिपदं मागितली तर एक पण मिळणार नाही. भाजपचे 120 आमदार झालेत. मागच्या वेळेप्रमाणे सेनेला 15 मंत्रिपदे देण्याची शक्यता. आणखी काही महत्वाची खाती देतील”, असं आठवले म्हणाले.

अमित शहा लवकरच मुंबईत येणार आहेत. त्यानंतर प्रश्न मिटणार आहे. आमचे मित्र पक्षाचे 7 आमदार आहेत. घटक पक्षांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत असं वाटतं. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनणार. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच नाही. अडीच वर्षाचा फॉर्म्युला आम्हाला मंजूर नाही, पाच वर्षाचाच फॉर्म्युला योग्य आहे, असंही आठवलेंनी सांगितलं. 105 भाजप, 7 मित्रपक्ष, 8 अपक्ष यांच्यामुळे भाजपचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.