AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Ghosalkar | ‘महाराष्ट्रात खून करण्याची नवीन सुपारी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला चाललेत का?’

Abhishek Ghosalkar | "गणपत गायकवाड सांगतायत, एकनाथ शिंदेमुळे मी गोळीबार केला. माझे कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे पडले आहेत. तरी या राज्यातला कायदा-पोलीस कारवाई करायला तयार नाहीत" असं संजय राऊत म्हणाले.

Abhishek Ghosalkar | 'महाराष्ट्रात खून करण्याची नवीन सुपारी घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला चाललेत का?'
sanjay raut-devendra fadnavis
| Updated on: Feb 09, 2024 | 10:46 AM
Share

मुंबई : “8 हजार कोटीच अॅमब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळालय? त्यात अशा प्रकरणात किती माफिया मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित आहेत ते लवकर बाहेर येईल. हे काम देण्यासाठी ज्या बाळाराजांकडून दबाव आला, त्याच्यात ते एकटे नसून मुंबई-पुण्यातले माफीया लाभार्थी आहेत” असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. “सरकारी पैशाने गुंडगिरी वाढवायची, सरकारी पैशाने माफीयाना बळ द्यायच. पोलीस गुंडांचे सरंक्षक झाले आहेत. शिंदे टोळीत पोलीस आणि गुंड एकत्र आहेत. मुंबई-ठाण्यात ज्या पोलिसांच्या नेमणूका झाल्या, ते शिंदे सेनेचे सदस्य आहेत. त्यांचा हिशोब 2024 निवडणुकीनंतर होईल. त्यांची यादी तयार आहे” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, त्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाच नाव आलं आहे. पोलिसांनी शिंदे यांची चौकशी केली पाहिजे. गणपत गायकवाड सांगतायत, एकनाथ शिंदेमुळे मी गोळीबार केला. माझे कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे पडले आहेत. तरी या राज्यातला कायदा-पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. तेच झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, पण महाराष्ट्रात गुंडांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जात नाही, हे दुर्देव आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘रोज दीड वर्ष गुंडगिरीच्या बातम्या’

“अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा नंगानाच पहायला मिळाला, तो अस्वस्थ करणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. रोज दीड वर्ष गुंडगिरीच्या बातम्या कानावर येत आहेत. या राज्याचे गृहमंत्री कुठे अदृश्य आहेत. गृहमंत्री विदर्भात भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत फिरत आहेत. महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा कधी करणार?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

‘कठोर कारवाई करणार, कोणावर?’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा नियोजित आहे. त्या बद्दल संजय राऊत यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, “महाराष्ट्रात खून करण्याची नवीन सुपारी घेण्यासाठी ते दिल्लीला चाललेत का?. कायदा-सुव्यवस्थेबद्दल एका शब्दाने बोलले नाहीत. कठोर कारवाई करणार, कोणावर? आमच्या शिवसैनिकांवर, गुंडांवर कारवाई नाही का? हे गुंड तुमचे कोण लागतात?”

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा