AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत

मोदींना खलनायक म्हटल्यामुळे त्यांची प्रतिमा अजून चांगली होती आणि विरोधाक त्यांची एकप्रकारे मदतच करत आहेत, असं सिंघवी (Abhishek Manu singhvi) यांनी म्हटलंय. मोदींचं महत्त्व नाकारुन आणि त्यांना प्रत्येक वेळी खलनायक म्हणून काहीही साध्य होणार नाही, असं जयराम रमेश (Jayram Ramesh) म्हणाले होते.

मोदींना सतत खलनायक म्हणून मुकाबला अशक्य, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं मत
| Edited By: | Updated on: Aug 23, 2019 | 5:18 PM
Share

नवी दिल्ली : एकापाठोपाठ एक काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच खलनायक ठरवणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu singhvi) यांनीही याबाबत मत व्यक्त केलंय. मोदींना खलनायक म्हटल्यामुळे त्यांची प्रतिमा अजून चांगली होती आणि विरोधाक त्यांची एकप्रकारे मदतच करत आहेत, असं सिंघवी (Abhishek Manu singhvi) यांनी म्हटलंय. मोदींचं महत्त्व नाकारुन आणि त्यांना प्रत्येक वेळी खलनायक म्हणून काहीही साध्य होणार नाही, असं जयराम रमेश (Jayram Ramesh) म्हणाले होते.

सिंघवी यांनी जयराम रमेश यांच्या वक्तव्याचा दाखला देत मत मांडलं. “मी नेहमीच सांगितलंय की मोदींना खलनायक सादर करणं चुकीचं आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून नव्हे, तर असं करुन विरोधक एक प्रकारे त्यांची मदतच करत आहेत. काम नेहमीच चांगलं, वाईट किंवा किरकोळ असतं. कामाचं मूल्यांकन व्यक्ती नव्हे, तर मुद्द्यांच्या आधारावर व्हायला हवं, जसं की उज्ज्वला योजना हे चांगल्या कांमांपैकी एक आहे,” असं ट्वीट सिंघवी यांनी केलं.

जयराम रमेश यांनीही बुधवारी याच पद्धतीचं मत मांडलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी 2014 ते 2019 या काळात ज्या पद्धतीने काम केलंय, त्याचं महत्त्व ओळखण्याची गरज आहे. याचमुळे ते पुन्हा सत्तेत परतले आहेत. सरकारी मॉडल हे पूर्णपणे नकारात्मक नाही, असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केलं. त्यांनी राजकीय विश्लेषक कपिल सतीश कोमीरेड्डी यांच्या पुस्तक ‘मालेवॉलेंट रिपब्लिक: अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ द न्यू इंडिया’ चं प्रकाशन करताना हे मत मांडलं.

मोदी अशा भाषेत बोलतात, जी त्यांना लोकांशी जोडून ठेवते. मोदी अशी कामं करत आहेत, ज्यामुळे जनता त्यांचं कौतुक करत आहे आणि ही कामं यापूर्वी झालेली नाहीत, हे आपण जोपर्यंत मान्य करत नाही, तोपर्यंत मोदींचा सामना करणं अशक्य आहे, असं जयराम रमेश म्हणाले. सोबतच तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना खलनायक म्हणत असाल तर त्यांचा सामना होऊ शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....