AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींच्या पावलावर फडणवीसांचं पाऊल, भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी पाठवणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचं ठरवलं आहे. फडणवीसांनी मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे. हे ऑपरेशन आहे भ्रष्टाचार तसंच अकार्यक्षमेतवर वार करण्यासाठी.

मोदींच्या पावलावर फडणवीसांचं पाऊल, भ्रष्ट अधिकाऱ्यांना घरी पाठवणार
| Updated on: Jun 21, 2019 | 10:36 AM
Share

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचं ठरवलं आहे. फडणवीसांनी मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे.  हे ऑपरेशन आहे भ्रष्टाचार तसंच अकार्यक्षमेतवर वार करण्यासाठी. त्यामुळं भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणणाले आहेत. प्रत्येक सरकारी खात्यातील भ्रष्ट आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा फडणवीस सरकारचाही प्लॅन आहे. मोदींनंतर आता फडणवीसांकडून भ्रष्टाचारावर वार होणार आहे. मोदींकडून आतापर्यंत 27 भ्रष्ट अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. आता फडणवीसांच्या निशाण्यावर महाराष्ट्रातले अधिकारी आहेत.  30 वर्षांहून अधिक काळ सेवेतील कर्मचाऱ्यांचं पुनरावलोकन होणार करण्यात येणार आहे.

फडणवीस सरकारनं आता आपल्या कर्मचाऱ्यांचं परफॉमर्न्स आणि भ्रष्टाचारावरुन तपासणी करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.

ज्यांच्या नोकरीची 30 वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा ज्यांच्या वयाची 50-55 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा कर्मचाऱ्यांचं पुनरावलोकन करण्यात येणार आहे. ज्यांची समाधानकारक कामगिरी नाही किंवा शारिरीकदृष्ट्या अकार्यक्षम असलेले आणि भ्रष्टाचारी असल्याचं पाहणीत आढळून आल्यास कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होणार.

विशेष म्हणजे विधानपरिषदेत शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी, कल्याण- डोंबिवलीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील कारवाईसंदर्भात प्रश्न विचारला होता.त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं.

सरकारी कार्यालयातील कामांना गती मिळावी आणि भ्रष्टाचारावर हातोडा मारण्यासाठी फडणवीस सरकारनं पाऊल उचललं आहे.

कोणत्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाड?

  • गट अ, ब, क आणि ड चे अधिकारी
  • अधिकाऱ्यांच्या विरोधातील वैद्यकीय चाचण्या आणि भ्रष्टाचाराच्या संशयास्पद व्यवहाराची माहिती 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल
  • 31 मार्चपर्यंत या अधिकाऱ्यांच्या नोकरीबद्दल निर्णय घेण्यात येईल
  • त्यासाठी जिल्हा स्तरापासून मंत्रालयापर्यंत समित्या स्थापन झाल्या आहेत

पंतप्रधान मोदींनीही दुसऱ्यांदा सत्तेचा कार्यभार सांभाळताच, भ्रष्टाचारावर वार करत अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देत घरी बसवलं.

मोदींनी 10 जूनला 12 आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिली. तर 18 जूनला 15 कस्टम, एक्साईजच्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली.

कार्यकाळ संपण्याच्या साडे 3 महिन्याआधी फडणवीस सरकारनं भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना धडकी भरवली आहे. आता नेमके कोणते बडे मासे जाळ्यात अडकतात, हे तपासणीतून स्पष्ट होईल.

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.