AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

अखेर शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला. कृषी मंत्र्यांनी नुकताच कर्जमाफीबाबत अत्यंत मोठी घोषणा केली. तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देऊन 36 हजार कोटींचे कर्ज माफ केले. सरकारकडून हे मोठे गिफ्ट म्हणावे लागेल.

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा
Datta Bharne
| Updated on: Jun 08, 2026 | 12:46 PM
Share

बळीराजासाठी दिलासा मिळाला आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा केली आहे. हा सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. दत्तात्रय भरणे यांनी बोलताना म्हटले की, शेतकऱ्यांना सांगतो 12 जून ते 15 जून पावसाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी.  मराठवाडा, खानदेश भागात सर्वदुर पाऊस पडणार नाही. पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी. मे आणि जूनमध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. जळगाव, अमरावती, बुलढाणा या भागात पिकाचे अधिक नुकसान झाले. 24 जिल्ह्यांना पाऊसाचा फटका बसलाय. 1लाख 40 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. घराचे देखील नुकसान झाले. सगळे पंचनामे करा अस आदेश दिले आहेत म्हणजे लवकरात लवकर मदत करता येईल.

पुढे युरिया खताबाबत बोलताना दत्ता भरणे यांनी म्हटले की, आपल्याकडे स्टॉक आहे, युद्धामुळे थोडी अडचण आहे, केंद्रीय कृषी मंत्री यांना विनंती केलीये. शेतकऱ्यांना वाटतेय पेट्रोल डिझेलच झाले तस खाताचे होऊ नये. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. 36 हजार 585 कोटी 56 लाख शेतकऱ्यांना लाभ भेटणार असल्याचा अंदाज आहे.

अटींमध्ये सुधारणा करण्याचे गरजेचे आहे ते केल्या जातील. सरकार अडचणीत असून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चांगला निर्णय घेतला आहे.  बच्चू कडू यांच्या हमी भाव मागणीबाबत आम्ही सहमत आहोत. भुजबळांच्या नाराजीवर बोलताना दत्ता भरणे यांनी म्हटले की, या बाबतीत सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतलाय तो योग्य असेल भुजबळ जेष्ठ नेते आहे, मात्र सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत. भुजबळ नाराज नाहीत, भुजबळ लढवय्या नेते आहेत.

रोहित पवार यांच्या ट्विटवर बोलताना त्यांनी म्हटले की, जळगाव जिल्ह्यात जे नुकसान झाले त्याची पाहणी स्वतः रक्षा खडसे आणि स्थानिक नेते करत आहेत. बारामती किशोर मासाळ नगरसेवक याबाबत बोलताना दत्ता भरणे यांनी म्हटले की,  मला याची माहिती नाही, मात्र त्यांनी माफी मागितलेल मी पाहिलं.

Follow Us
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार