AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणावरून सभागृहात गोंधळ, अजित पवार म्हणाले “सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालायचा नसतो, तुम्ही तर…”

आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी, अजित पवार यांनी उत्तर दिलं...

दिशा सालियान मृत्यूप्रकरणावरून सभागृहात गोंधळ, अजित पवार म्हणाले सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालायचा नसतो, तुम्ही तर...
| Updated on: Dec 22, 2022 | 1:34 PM
Share

नागपूर : सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून (Sushant Singh Rajput Death Case) राज्यातील राजकारण तापलंय. सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. यावरून सभागृहात गोंधळ (Assembly Winter Session) पाहायला मिळाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“सत्ताधारी पक्षाने गोंधळ घालायचा नसतो. त्यांनी विरोधकांच्या, जनतेच्या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात. इथं उलटं दिसत आहे. सत्ताधारीच विधिमंडळात गोंधळ घालत आहेत”, असं अजित पवार म्हणालेत.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी शिंदेगट आणि भाजपकडून करण्यात येत आहे. विशेषत: नितेश राणे यांनी ही मागणी लावून घरली आहे. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा हे कुणाचीही नार्को टेस्ट करायला सांगतील. ते उद्या तुमचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी करतील. नार्को टेस्ट करण्याचं कारण काय? असं चालत नाही, असं अजित पवार म्हणालेत.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात जसं आफताब पुनावालाची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आलं. तसंच आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा. सुशांतसिंह केसमधील सत्य समोर येईल, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलंय.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधिमंडळात गोंधळ पाहायला मिळाला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची केस रिओपन करा. या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली. त्यानंतर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.