AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी जे 1978 मध्ये केलं, तेच अजित पवारांनी आज केलं?

महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारची सकाळ (23 नोव्हेंबर) भूकंप घडवत उजाडली. शनिवारी सकाळी राज्यातील राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले.

शरद पवारांनी जे 1978 मध्ये केलं, तेच अजित पवारांनी आज केलं?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Nov 23, 2019 | 7:34 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारची सकाळ (23 नोव्हेंबर) भूकंप घडवत उजाडली. शनिवारी सकाळी राज्यातील राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar use sharad pawar formula) यांनी आपल्या पक्षाला मोठा झटका दिला. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ताज फडणवीसांना घातला आणि स्वत: उपमुख्यमंत्री (Ajit pawar use sharad pawar formula) बनले आहेत.

पक्ष सोडून सत्ता मिळवण्याची ही घटना पवार कुटुंबात नवीन नाही. यापूर्वीही ठिक 41 वर्षापूर्वी 1978 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवारांसारखी राजकीय खेळी केली होती. त्यावेळी शरद पवारांनी पक्ष फोडून थेट मुख्यमंत्रिपद मिळवले होते. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता.

1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा जनता पक्षाकडून पराभव झाला होता. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी या पराभवाची जबाबदारी स्विकारत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याऐवजी वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्रिपदी बसवण्यात आले. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले आणि दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून जनता पक्ष ठरला होता. पण त्यांच्याकडे बहुमत नव्हते. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या दोन गटांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये शरद पवार उद्योग आणि कामगार मंत्री होते.

शरद पवार यांनी जुलै 1978 मध्ये आपला पक्ष सोडला. या दरम्यान त्यांनी काही आमदारही फोडले. यानंतर त्यांना जनता पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबाही दिला. जनता पक्षाच्या पाठिंब्याने शरद पवार पहिल्यांदाचा 1978 मध्ये 38 वर्षाच्या वयात मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणही पक्षात परतले होते.

दरम्यान, इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर फेब्रुवारी 1980 मध्ये पवारांच्या नेतृत्वातले पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार पडले. त्यानंतर पुढील निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. काँग्रेसकडून अब्दुल रहमान अंतुले यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले.

Follow Us
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...