AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akbaruddin Owaisi : जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, राज ठाकरेंचं नाव न घेता अकबरुद्दीन ओवैसींची औरंगाबादेत जळजळीत टीका

एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादेतून राज ठाकरेंचं नाव न घेता सडकून टीका केली आहे. ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले तुम्हाला घाबरायाची गरज नाही. जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, उसे भोंकने दो, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला आहे.

Akbaruddin Owaisi : जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, राज ठाकरेंचं नाव न घेता अकबरुद्दीन ओवैसींची औरंगाबादेत जळजळीत टीका
जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, राज ठाकरेंचं नाव न घेता अकबरुद्दीन ओवैसींची औरंगाबादेत जळजळीत टीकाImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 12, 2022 | 7:40 PM
Share

औरंगाबाद : राज्यात आधीच मोठा पॉलिटिकल राडा सुरू असताना त्यात आता आणखी एक ठिणगी पडली आहे. कारण एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगाबादेतून राज ठाकरेंचं (Raj Thackeray) नाव न घेता सडकून टीका केली आहे. ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले तुम्हाला घाबरायाची गरज नाही. जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, उसे भोंकने दो, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला आहे. आज अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्या वरती अप्रत्यक्ष टीका करताना राज ठाकरे यांचा अत्यंत तीक्ष्ण शब्दात समाचार घेतला. कुत्री भुंकत असतात त्यांना भूक उद्या सिंहाचा (Lion) काम आहे शांतपणे निघून जाणे तुम्ही पण त्याच्यावरती हसत हसत निघून जा, अशा शब्दात अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. तर दुसऱ्या बाजूला मी त्याच्यावर टीका काय करू मी त्याच्यावर टीका करावी तेवढी त्याची औकात नाही. माझा तर एक खासदार आहे. तर ते तर बेघर आहेत त्यांना तर घरातून काढून टाकले होते त्यांच्यावर मी काय बोलू अशाही शब्दात समाचार घेतला आहे.

मी कुणाला घाबरत नाही

तर मी कुणाला घाबरत नाही, केवळ अल्लाहला घाबरतो. माझ्यावर हल्ला होण्यापूर्वी दोन शाळा सुरू केल्या, त्याच्या आशीर्वादाने मी हल्ल्यातून बचावलो. दुनियाने बदनाम केले पण त्यातून निर्दोष झालो. मी कुणाबद्दल वाईट बोलण्यासाठी आलो नाही. लवकरच आमखास मैदानात येऊन बोलेण, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कठीण काळात मनं जिंकली

तसेच महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुस्लिमांना अकबर ओवैसी विसरणार नाही. २०१३-१४ मध्ये एमआयएमची ताकद नसतानाही जंगी स्वागत करण्यात आले. प्रवास कठीण होता, पण महाराष्ट्रात लोक जोडले गेले आणि महाराष्ट्रातील मुसलमानांची मने जिंकली. असेही ते म्हणाले. तसेच मुस्लिमांच्या सध्यस्थितीवरही त्यांनी भाष्य केले आहे. आज हिंदुस्थानात सगळ्याच क्षेत्रात मुस्लिम मागे आहेत. जो मागे आहे, त्याचा हात पकडून त्यांना पुढं घेऊन जायचं काम मी करतोय. सगळे समाज पुढं गेले तर राष्ट्र सुपर पॉवर होईल, असेही ते म्हणाले.

शाळा सर्वांसाठी खुली

शाळा सुरू केल्यानंतर केवळ मुस्लिमच नाही तर हिंदूंसाठीही आमची शाळा खुली आहे. आज जर आपण सद्यस्थितीचा सामना करायचा असेल तर केवळ केवळ घोषणाबाजी करून चालत नाही. आजच्या कार्यक्रमामध्ये कोणतही राजकारण नाही. कोणत्याही राजकारणासाठी हे शाळा सुरू करण्याचा कार्यक्रम केला नाही, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.