AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anandrao Adsul : ‘अमित शाह म्हणाले कृपा करुन…’, काय म्हणाले आनंदराव अडसूळ? VIDEO

Anandrao Adsul : "कुठल्यातरी बाईच्या घरी जायचं, तिथे पोळ्या लाटायच्या. अरे, तुझ्या घरी पोळ्या लाटना. तुझ्या घरी तू पोळी लाटली का? पोळी लाटून एकदा नवरा-मुलाला खाऊ घाल. या सगळ्या नाटकाची लोकांना भयंकर चीड आहे" असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

Anandrao Adsul : 'अमित शाह म्हणाले कृपा करुन...', काय म्हणाले आनंदराव अडसूळ? VIDEO
Anandrao Adsul-Amit Shah
| Updated on: May 24, 2024 | 2:22 PM
Share

“मागची निवडणूक मी हरलो नाही, हरवलो गेलो. मी कोणाचे नाव घेणार नाही, पण योग्य वेळी घेईन” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. “नवनीत राणांचा पराभव नक्की आहे. पाच वर्षात काम केलं नाही. त्यामुळे त्या हरणार” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. नवनीत राणांवर त्यांनी खूप बोचरी टीका केली. “नवनीत राणा फक्त नाटकबाजी करतात. आदिवासी महिलांमध्ये जाऊन तिथे फेर धरायचा. दहीहंडीचा कार्यक्रम करायचा. एखाद्या कार्यक्रमाला अभिनेता आणायचा. हे काम लोकांना आवडणार नाही” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

“कुठल्यातरी बाईच्या घरी जायचं, तिथे पोळ्या लाटायच्या. अरे, तुझ्या घरी पोळ्या लाटना. तुझ्या घरी तू पोळी लाटली का? पोळी लाटून एकदा नवरा-मुलाला खाऊ घाल. या सगळ्या नाटकाची लोकांना भयंकर चीड आहे” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. “यावेळी, जर मी त्या ठिकाणी निवडणूक लढलो असतो, तर 100% जिंकून आलो असतो. नाटकबाजी पाहिल्यानंतर लोकांमध्ये संताप होतो” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. ‘ईडीसुद्धा माझ्या मागे लावून दिली’

“मुस्लीम माझ्याकडे आले आणि बोलले की तुम्ही कुठल्याही पक्षाकडून लढा, आम्ही तुम्हाला निवडून आणणार” असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला. “अमित शाहा म्हणाले की, तुम्ही यावेळी कृपा करून लढू नका. ही जागा मला हवी आहे” असा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला. “मला मानसिक त्रास झाला, शारीरिक त्रास झाला. ईडीसुद्धा माझ्या मागे लावून दिली. त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले असून मी त्याची वाट पाहत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे माझ्या मनात आहे” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.