AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘व्हॅलेंटाईन्स डे’ नाही, अरविंद केजरीवालांनी शपथविधीसाठी निवडला वेगळा मुहूर्त

अरविंद केजरीवाल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तो दिवस होता 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे!

'व्हॅलेंटाईन्स डे' नाही, अरविंद केजरीवालांनी शपथविधीसाठी निवडला वेगळा मुहूर्त
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 12, 2020 | 11:09 AM
Share

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारल्यानंतर ‘आम आदमी पक्षा’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येत्या रविवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानावर केजरीवालांचा शपथविधी (Arvind Kejriwal Oath Ceremony Date) होणार आहे.

काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर अरविंद केजरीवालही दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 62 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावं लागत आहे. काँग्रेसचा पुरता सुपडासाफ झाला आहे. दिल्लीतील सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

14 फेब्रुवारीचं कनेक्शन तुटलं

अरविंद केजरीवाल यांनी सर्वात आधी 28 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र, 49 दिवसांनंतर 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

2013 मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला 31, ‘आप’ला 28 आणि काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळाला होता. या त्रिशंकू स्थितीत ‘आप’ने काँग्रेसला सोबत घेत सरकार स्थापन केलं होतं. मात्र अवघ्या 49 दिवसांमध्येच अरविंद केजरीवाल यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

मोठ्या राजकीय नाट्यानंतर 2015 मध्ये दिल्लीत पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. ‘आप’ने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावून 70 पैकी 67 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं, तर भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जनतेचे आभार मानले. दिल्लीतील ‘आप’ कार्यालयाबाहेर केजरीवालांनी माध्यमांशी संवाद साधला. “सर्व दिल्लीवासीयांचे आभार. त्यांनी मला तिसऱ्यांदा निवडून देऊन ही संधी दिली. हा कामाचा विजय आहे, हा देशाचा विजय आहे, हा भारतमातेचा विजय आहे”, असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीवालो आपने कमालही कर दिया, I Love You, असं म्हणत केजरीवालांनी दिल्लीकरांवरील प्रेम (Arvind Kejriwal Oath Ceremony Date) जाहीर केलं.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक