AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाणांना सोळा नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे वेध?

नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात मला चांगल्या व्यक्ती हव्या आहेत, असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं (Ashok Chavan Congress Nanded)

अशोक चव्हाणांना सोळा नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे वेध?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 25, 2021 | 8:18 AM
Share

नांदेड : नांदेडमध्ये आणखी काही दिग्गज नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात मला चांगल्या व्यक्ती हव्या आहेत, असं वक्तव्य चव्हाणांनी केलं. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात नव्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते मारोती कवळे (Maroti Kawle) यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी अशोक चव्हाण बोलत होते. (Ashok Chavan hints at new leaders joining Congress in Nanded)

नायगांव विधानसभा मतदारसंघात मला मारोती कवळे यांच्या रुपाने भाऊच मिळाला, अशा शब्दात चव्हाणांनी स्तुतिसुमनं उधळली. नांदेड जिल्ह्यातील उमरी भागात काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या निमित्ताने काँग्रेसने केलेल्या शक्तीप्रदर्शनाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

भोकर नगरपंचायतीसाठी चव्हाण मैदानात

दुसरीकडे, भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेची सत्ता आल्यामुळे अशोक चव्हाण यांना नुकताच जोरदार धक्का बसला होता. आता भोकर नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नांदेडचे पालकमंत्री या नात्याने अशोक चव्हाणही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भोकर शहरात आगामी काळात विविध विकास कामांचे उद्घाटन ते करणार आहेत.

कोण आहेत मारोती कवळे?

वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले मारोती कवळे गुरुजी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला उमरी तालुक्यातील एक प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या कवळे गुरुजींच्या काँग्रेस प्रवेशाने नायगांव विधानसभा मतदारसंघातील चित्रच बदलणार आहे.

राष्ट्रवादी सोडून वंचितमध्ये प्रवेश

कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. पतपेढीच्या माध्यमांतून कवळे गुरुजींनी हजारो शेतकऱ्यांना आर्थिक हाथभर लावत पायावर उभे केलंय. दूध, गुळाच्या व्यवसायात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आपल्याशी जोडलेलं आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक असलेले कवळे गुरुजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

अजित पवारांच्या मर्जीतील नेते

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खास मर्जीतील नेते म्हणून देखील कवळे गुरुजींची ओळख आहे. मात्र गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीत उडी मारली आणि नायगाव विधानसभा लढवली. या निवडणुकीत त्यांनी भरघोस मते घेतली मात्र इथून भाजपचा उमेदवार विजयी झाला. या अपयशानंतर कवळे गुरुजी गेली वर्षभर राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिले. (Ashok Chavan hints at new leaders joining Congress in Nanded)

चव्हाण यांचे राजकीय गणित

नायगांव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे. त्यामुळे नायगांव विधानसभा मतदारसंघात रिक्त होणारी पोकळी कवळे गुरुजींच्या माध्यमातून भरली जाणार आहे. एक चारित्र्यसंपन्न , मितभाषी आणि मदतीसाठी धावणारा नेता अशी कवळे गुरुजींची ओळख आहे.

विधानसभेला तिकिटाची शक्यता

कवळे गुरुजींच्या चांगल्या प्रतिमेमुळे नायगांव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस त्यांना संधी देऊ शकते. नांदेड लोकसभेत पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण सुरू केलं आहे. चांगल्या नेत्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी चव्हाण प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कवळे गुरुजींचा राजकीय प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र बदलणारा ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

अशोक चव्हाण यांचं बेरजेचं राजकारण, वंचितच्या नेत्याचा काँग्रेस प्रवेश

ग्रामपंचायतीत धक्का, अशोक चव्हाण नांदेडमधील सर्वात महत्त्वाच्या नगरपंचायत निवडणुकीसाठी मैदानात

(Ashok Chavan hints at new leaders joining Congress in Nanded)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र