“मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये”, सामनातील बातमीवरुन अतुल भातखळकरांचा राऊतांना टोला

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये ममता बॅनर्जी यांची छापण्यात आली आहे. हाच धागा पकडू अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय.

मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये, सामनातील बातमीवरुन अतुल भातखळकरांचा राऊतांना टोला
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 10:29 PM

मुंबई : यास चक्रीवादळाने पश्चिम बंगालला जोरदार तडाखा दिला. अळावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जवळपास 30 तास मंत्रालयात कंट्रोल रुममध्ये ठाण मांडून होत्या. राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर त्यांनी लक्ष ठेवलं. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर यास धडकण्यापूर्वी मंगळवारी तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी मंत्रालयातच ठाण मांडून बसणार आहेत, अशी माहिती देण्यात आली होती. याबाबत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये छापण्यात आली. हाच धागा पकडून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय. (Atul Bhatkhalkar criticizes Sanjay Raut over Mamata Banerjee’s news in Saamana)

अतुल भातखळकर यांनी ट्वीट करुन संजय राऊत यांना टोला हाणलाय. त्याचबरोबर त्यांनी तौत्के चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्यावरही टीका केलीय. “संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौक्ते वादळाच्या काळात उद्धव ठाकरे घरी दडी मरून बसलेले हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा… सामानाची बातमी… ‘यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार.’ मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये”, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

सामनातील बातमी काय?

यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी रात्री मंत्रलयातच ठाण मांडून राहिल्या. नियंत्रण कक्षातून त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदतीबाबत योग्य सूचनाही केल्या. ममता बॅनर्जी मंगळवारी मंत्रालयातच थांबणार असल्याची बातमी सामनात छापण्यात आली आहे. या बातमीमध्ये ममता बॅनर्जी यांचं कौतुकही करण्यात आलंय.

मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपची टीका

दरम्यान, तौत्के चक्रीवादळने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे या 3 जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी तीन दिवसांचा कोकण दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक दिवसाचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यावर भाजप नेत्यांनी सडकून टीका केलीय. मुख्यमंत्र्यांना दौरा चक्रीवादळापेक्षाही वेगवान होता, असा टोला भाजप आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO: यास चक्रीवादळ वेगानं पश्चिम बंगालच्या दिशेने; वस्त्यांमध्ये शिरलं समुद्राचं पाणी

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचे थैमान, लोकांच्या कार पाण्यात बुडाल्या

Atul Bhatkhalkar criticizes Sanjay Raut over Mamata Banerjee’s news in Saamana

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.