AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात मुद्दाच निकाली लावतो… पालकमंत्री होताच भूमरेंची ‘ही’ घोषणा!

दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गटासात मोठी इनकमिंग होणार असल्याचा गौप्यस्फोटही संदिपान भूमरे यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

वर्षभरात मुद्दाच निकाली लावतो...  पालकमंत्री होताच भूमरेंची 'ही' घोषणा!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 26, 2022 | 10:15 AM
Share

औरंगाबादः पालकमंत्री होताच संदिपान भूमरे (Snadipan Bhumre) यांनी औरंगाबादसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या 12 महिन्यात शहराचा पाणीप्रश्न (water issue) सोडवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. वर्षभराच्या आत शहराला दररोज पाणीपुरवठा करणार असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) कामकाजावरही टीका केली. मागील अडीच वर्षात यांनी काय केलं? ते मातोश्रीच्या बाहेरही निघाले नाहीत, असं वक्तव्य भूमरे यांनी केली.

शहरात सगळ्यात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे. त्यामुळे वर्षभरात मी या शहराला पाणी आणणार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

औरंगाबादचा पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटलेला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तर भाजपने यावरुन रान पेटवलं होतं. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी येथे जलाक्रोश मोर्चा काढला होता.

त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी शिवसेनेविरोधात शिंदे-भाजप लढतीत पाणी प्रश्नावरून रणकंदन माजणार हे निश्चित आहे. कारणही तसंच आहे.

पहा भूमरे काय म्हणालेत?

आशियातील सर्वात मोठं जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. मात्र शहराला कुठे सहा तर कुठे सात दिवसांनी पाणीपुरवठा होतो.

शहरातील जुनी जलवाहिनी अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. 1680 कोटी रुपये बजेट असलेल्या नव्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. मात्र ते अत्यंत संथ गतीने.

जुन्या जलवाहिनीला वारंवार गळती होते. ती नादुरुस्त झाली की शहराचा आधीच दिरंगाईने सुरु असलेल्या पाणीपुरवठा अजून लांबतो. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ होते.

नव्या पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याच मुद्द्यावर पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी भाष्य केलं आहे.

आता आम्ही वर्षभरात शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणालेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली.

चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद शहराचे भकास पालकमंत्री होते, अशी सणसणीत टीका त्यांनी केली आहे. मी मात्र शहराचा विकास करणार, असे ते म्हणालेत.

दसरा मेळाव्यात इनकमिंग?

दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गटासात मोठी इनकमिंग होणार असल्याचा गौप्यस्फोटही संदिपान भूमरे यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच