AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात मुद्दाच निकाली लावतो… पालकमंत्री होताच भूमरेंची ‘ही’ घोषणा!

दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गटासात मोठी इनकमिंग होणार असल्याचा गौप्यस्फोटही संदिपान भूमरे यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

वर्षभरात मुद्दाच निकाली लावतो...  पालकमंत्री होताच भूमरेंची 'ही' घोषणा!
Image Credit source: social media
| Updated on: Sep 26, 2022 | 10:15 AM
Share

औरंगाबादः पालकमंत्री होताच संदिपान भूमरे (Snadipan Bhumre) यांनी औरंगाबादसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या 12 महिन्यात शहराचा पाणीप्रश्न (water issue) सोडवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. वर्षभराच्या आत शहराला दररोज पाणीपुरवठा करणार असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) कामकाजावरही टीका केली. मागील अडीच वर्षात यांनी काय केलं? ते मातोश्रीच्या बाहेरही निघाले नाहीत, असं वक्तव्य भूमरे यांनी केली.

शहरात सगळ्यात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे. त्यामुळे वर्षभरात मी या शहराला पाणी आणणार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

औरंगाबादचा पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटलेला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तर भाजपने यावरुन रान पेटवलं होतं. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी येथे जलाक्रोश मोर्चा काढला होता.

त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी शिवसेनेविरोधात शिंदे-भाजप लढतीत पाणी प्रश्नावरून रणकंदन माजणार हे निश्चित आहे. कारणही तसंच आहे.

पहा भूमरे काय म्हणालेत?

आशियातील सर्वात मोठं जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. मात्र शहराला कुठे सहा तर कुठे सात दिवसांनी पाणीपुरवठा होतो.

शहरातील जुनी जलवाहिनी अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. 1680 कोटी रुपये बजेट असलेल्या नव्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. मात्र ते अत्यंत संथ गतीने.

जुन्या जलवाहिनीला वारंवार गळती होते. ती नादुरुस्त झाली की शहराचा आधीच दिरंगाईने सुरु असलेल्या पाणीपुरवठा अजून लांबतो. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ होते.

नव्या पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याच मुद्द्यावर पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी भाष्य केलं आहे.

आता आम्ही वर्षभरात शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणालेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली.

चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद शहराचे भकास पालकमंत्री होते, अशी सणसणीत टीका त्यांनी केली आहे. मी मात्र शहराचा विकास करणार, असे ते म्हणालेत.

दसरा मेळाव्यात इनकमिंग?

दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गटासात मोठी इनकमिंग होणार असल्याचा गौप्यस्फोटही संदिपान भूमरे यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.