AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात मुद्दाच निकाली लावतो… पालकमंत्री होताच भूमरेंची ‘ही’ घोषणा!

दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गटासात मोठी इनकमिंग होणार असल्याचा गौप्यस्फोटही संदिपान भूमरे यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

वर्षभरात मुद्दाच निकाली लावतो...  पालकमंत्री होताच भूमरेंची 'ही' घोषणा!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 26, 2022 | 10:15 AM
Share

औरंगाबादः पालकमंत्री होताच संदिपान भूमरे (Snadipan Bhumre) यांनी औरंगाबादसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या 12 महिन्यात शहराचा पाणीप्रश्न (water issue) सोडवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. वर्षभराच्या आत शहराला दररोज पाणीपुरवठा करणार असं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) कामकाजावरही टीका केली. मागील अडीच वर्षात यांनी काय केलं? ते मातोश्रीच्या बाहेरही निघाले नाहीत, असं वक्तव्य भूमरे यांनी केली.

शहरात सगळ्यात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे. त्यामुळे वर्षभरात मी या शहराला पाणी आणणार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

औरंगाबादचा पाणी प्रश्न सध्या चांगलाच पेटलेला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तर भाजपने यावरुन रान पेटवलं होतं. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी येथे जलाक्रोश मोर्चा काढला होता.

त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी शिवसेनेविरोधात शिंदे-भाजप लढतीत पाणी प्रश्नावरून रणकंदन माजणार हे निश्चित आहे. कारणही तसंच आहे.

पहा भूमरे काय म्हणालेत?

आशियातील सर्वात मोठं जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात आहे. मात्र शहराला कुठे सहा तर कुठे सात दिवसांनी पाणीपुरवठा होतो.

शहरातील जुनी जलवाहिनी अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. 1680 कोटी रुपये बजेट असलेल्या नव्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. मात्र ते अत्यंत संथ गतीने.

जुन्या जलवाहिनीला वारंवार गळती होते. ती नादुरुस्त झाली की शहराचा आधीच दिरंगाईने सुरु असलेल्या पाणीपुरवठा अजून लांबतो. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ होते.

नव्या पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याच मुद्द्यावर पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी भाष्य केलं आहे.

आता आम्ही वर्षभरात शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणालेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली.

चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद शहराचे भकास पालकमंत्री होते, अशी सणसणीत टीका त्यांनी केली आहे. मी मात्र शहराचा विकास करणार, असे ते म्हणालेत.

दसरा मेळाव्यात इनकमिंग?

दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गटासात मोठी इनकमिंग होणार असल्याचा गौप्यस्फोटही संदिपान भूमरे यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत