AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ निश्चित?

उमेदवारी अर्ज (Aurangabad Shivsena BJP rebels) मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही अनेक बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे मतांचं विभाजन अटळ आहे

औरंगाबादेत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ निश्चित?
| Edited By: | Updated on: Oct 07, 2019 | 6:46 PM
Share

औरंगाबाद : बंडोबांमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद (Aurangabad Shivsena BJP rebels) जिल्ह्यात अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कारण, उमेदवारी अर्ज (Aurangabad Shivsena BJP rebels) मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही अनेक बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे मतांचं विभाजन अटळ आहे, ज्यामुळे औरंगाबादमधील प्रमुख विरोधी पक्ष एमआयएमला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात सहा जागा शिवसेना आणि तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. पण शिवसेनेच्या सहा जागांपैकी दोन जागांवर बंडखोरी झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन उमेदवार अडचणीत सापडले आहेत.

औरंगाबाद शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेनेचे संजय शिरसाठ हे मतदारसंघातून सातत्याने निवडून येतात, पण त्यांच्या विरोधात भाजपच्या राजू शिंदे यांनी बंडखोरी करून मोठं आव्हान उभं केलं आहे.

दुसरीकडे सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपने चांगलीच खिचडी शिजवली असल्याचं दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या सिल्लोडच्या बंडखोरांनी काँग्रेसच्या प्रभाकर पलोदकर यांना काँग्रेस सोडून देऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला भाग पाडलं. त्यांच्या मागे भाजपची सगळी ताकत उभी केली आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघात भाजपने शिवसेनेसोबत दगाफटका करण्याची तयारी सुरू केली आहे.

अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी काही बंडोबांनी त्यांचं बंड थंडही केलं. विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे फुलंब्रीचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात शिवसेनेच्या रमेश पवार यांनी दंड थोपटले होते. त्यांनीही तिथे माघार घेतल्यामुळे हरिभाऊ बागडे यांचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्या विरोधात शिवसेनेच्या राजू वैद्य यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांनीही माघार घेतल्यामुळे अतुल सावे यांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.

युतीच्या बंडखोरीचा एमआयएमला फायदा?

शिवसेना आणि भाजपच्या मतांचं विभाजन झालं तर काय निकाल येतो ते लोकसभेला पाहायला मिळालं. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली आणि त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. गेल्या काही वर्षात एमआयएमने औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला कडवी झुंज दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील तीन मतदारसंघांमध्ये एमआयएमला युतीच्या बंडखोरांमुळे फायदा होईल, असं जाणकार सांगतात.

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.