AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत शिवसेना-भाजपच्या बंडखोरीत एमआयएमचा लाभ?

या बंडखोरांचा प्रस्थापित उमेदवारांना फटका बसणार की बंडोबा थंडोबा होणार हा एक प्रश्न आहे. शिवाय औरंगाबाद शहरातील मध्य मतदारसंघातही हेच चित्र आहे.

औरंगाबादेत शिवसेना-भाजपच्या बंडखोरीत एमआयएमचा लाभ?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Oct 05, 2019 | 5:03 PM
Share

औरंगाबाद : तिकीट न मिळाल्याने शिवसेना-भाजपात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. पण याचा थेट फायदा विरोधी पक्षातील उमेदवाराला होण्याची चिन्हं आहेत. औरंगाबादेतही (Shivsena bjp Rebels Aurangabad) असंच चित्र आहे. शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक उमेदवारांना बंडखोरांनी (Shivsena bjp Rebels Aurangabad) घेरण्याची रणनीती आखली आहे. या बंडखोरांचा प्रस्थापित उमेदवारांना फटका बसणार की बंडोबा थंडोबा होणार हा एक प्रश्न आहे. शिवाय औरंगाबाद शहरातील मध्य मतदारसंघातही हेच चित्र आहे.

अब्दुल सत्तार यांची मातब्बर नेते म्हणून ओळख आहे. स्वतः अल्पसंख्याक समाजातून असूनही अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून आत्तापर्यंत दोन वेळा विजयावरती आपली मोहर उमटवली. याही वेळेला अब्दुल सत्तार यांचा गाडा सुसाट सुटलाय, पण त्यांच्या गाड्याला सिल्लोड मतदारसंघातील बंडखोर खीळ घालतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपच्या सुनील मिरकर आणि सुरेश बनकर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर काँग्रेसच्या प्रभाकर पलोदकर यांनीही भाजप बंडखोरांच्या बळावर रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या विजयी रथाला बंडखोर खीळ घालतील का असा सवाल उपस्थित होतोय.

दुसरीकडे औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात भाजपच्या शहराध्यक्षांनीच शड्डू ठोकले आहेत. भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी महायुतीत असतानाही प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शिवसेनेचाच असलेल्या वैजापूर मतदारसंघातही भाजपने मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे. जिल्हा अध्यक्ष नामदेव जाधव आणि दीपक परदेशी या दोघांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर औरंगाबाद पश्चिम मतदार संघातही शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनीही बंडखोरी केली आहे.

औरंगाबाद जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, आजही 9 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात शिवसेना आपल्या जागा लढवत आहे. मात्र त्यापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपने तुंबळ बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला आलिंगन देऊन संपवण्याचा विचार करत आहे का असा सवाल सध्या मतदारांमधून विचारला जात आहे.

… तर थेट एमआयएमला लाभ

भाजप आणि शिवसेना यांची मतं विभागली गेल्यास काय होतं याचा अनुभव नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आला. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी हिंदू मतांमध्ये फूट पाडली आणि शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा अत्यंत कमी मतांनी पराभव झाला, तर एमआयएमने विजय मिळवला. गेल्या विधानसभा निवडणुकीतही औरंगाबाद शहरात एमआयएमने विजय मिळवला होता. कारण, तेव्हाही शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. याही वेळेला बंडखोरी न रोखल्यास याचा थेट फायदा एमआयएमला होण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...