AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“उद्धव ठाकरेंच्या नशीबात दिव्यांगांची सेवा नव्हती”, बच्चू कडू यांचा घणाघात

बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

उद्धव ठाकरेंच्या नशीबात दिव्यांगांची सेवा नव्हती, बच्चू कडू यांचा घणाघात
| Updated on: Nov 30, 2022 | 10:31 AM
Share

मुंबई : आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे. “दिव्यांगांसाठी काम करणं हे पुण्याचं काम आहे. पण उद्धव ठाकरेंच्या नशीबात दिव्यांगांची सेवा नव्हती”, असं बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणालेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानलेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मी अनेकदा दिव्यांगांसाठीच्या कामाचा प्रस्ताव ठेवला पण त्याला यश आलं नाही. आता शिंदे सरकारच्या काळात या कामांना गती मिळाली आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

गुवाहाटीला गेल्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी राज्याच्या मुख्यसचिवांना फोन केला. त्यांनी सांगितलं की 29 तारखेच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये दिव्यांगांच्या मंत्रालयाचा मुद्दा चर्चिला जावा. तसंच झालं. मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करणं हा माझ्यावर एकनाथ शिंदे आणि सरकारचे उपकार आहेत. त्यांनी हा निर्णय घेऊन दिव्यांगांना न्याय दिला. मी त्यांचा कायम ऋणी राहिल, असं बच्चू कडू म्हणालेत.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करण्यात आली आहे. 3 डिसेंबरपासून या खात्याच्या कारभाराला सुरुवात होईल. यासाठी बच्चू कडू यांनी सरकारचे आभार मानलेत. “भारतातील पहिला दिव्यांग विभाग महाराष्ट्रात, आमच्या २० वर्षाच्या लढ्याला यश… हा दिवस आमच्यासाठी गौरवाचा, वैभवाचा व दिव्यांग बांधवाना गतिमान करण्याचा आहे. आम्हाला न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार…”, असं ट्विट बच्चू कडू यांनी केलं आहे.

दिव्यांगांसाठी काम करणं हे पुण्याचं काम आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या कामात आता दिरंगाई होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.