AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच एकनाथ शिंदे यांचं बंड, निकाल आमच्याच बाजूने, कुणी केलाय दावा?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर अनेक पेच टाळता आले असते हे उघड आहे. बच्चू कडू यांनी यावरच नेमकं बोट ठेवलं.

कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच एकनाथ शिंदे यांचं बंड, निकाल आमच्याच बाजूने, कुणी केलाय दावा?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 16, 2023 | 3:13 PM
Share

गजानन उमाटे, नागपूरः  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political crisis) सुनावणी अंतिम टप्प्यावर असतानाच सुप्रीम कोर्टाने (Supreme court) यासंबंधीचा निकाल राखून ठेवला आहे. ही सुनावणी आता ७ सदस्यीय घटनापीठासमोर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर नबाम रबिया खटल्याप्रमाणेच निकाल अपेक्षित आहे, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. तर हा खटला महाराष्ट्रातील सत्तापेचावर लागू होत नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येतोय. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले बच्चू कडू?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलाय. पण आम्हाला निकालाची चिंता नाही. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनंच एकनाथ शिंदे यांनी बंड केलंय. त्यामुळे निकाल कायद्याच्या म्हणजेच आमच्या बाजूनं लागणार. निवडणूक आयोगंही आमच्याच बाजूनं निकाल देणार” असा विश्वास माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय.

मविआच्या दोन चुका…

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर अनेक पेच टाळता आले असते हे उघड आहे. बच्चू कडू यांनी यावरच नेमकं बोट ठेवलं. ते म्हणाले, ‘ महाविकास आघाडी सरकारमध्ये आधी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा, त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा… अशा त्यांनी केलेल्या चुकांचा आम्हाला फायदा झालाय. असंही बच्चू कडू म्हणाले.

सुप्रीम कोर्टात आज काय ?

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज पूर्ण झाली. कोर्टात आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून कायदेशीर तथ्य आणि सत्तांतराच्या घटनाक्रमावर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. कोर्टाने आता याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणावर आता सुप्रीम कोर्टात कधीही निर्णय येण्याची शक्यता आहे. तसेच हे प्रकरण ७ सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवणार असल्याचं म्हटलं जातंय.

‘ठाकरे यांचा राजीनामा नैतिकतेला धरून’

घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सुप्रीम कोर्टात सादर झालेला युक्तिवाद आणि सत्ता संघर्षाच्या घटनाक्रमावर भाष्य केलं. लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे. या निकालादरम्यान आमदार अपात्र ठरले तर संपूर्ण सरकार बेकायदेशीर ठरेल आणि सरकारमध्ये अभूतपूर्व पेच निर्माण होईल. त्यामुळे लवकराक लवकर हा निकाल लागणं अपेक्षित आहे, अशी अपेक्षा उल्हास बापट यांनी व्यक्त केली.

तसेच उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा हा राजकीय नैतिकतेला धरून होता, त्याचा कायदेशीर बाबींशी काहीही संबंध नाही, असं वक्तव्य उल्हास बापट यांनी केलं.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच