AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटेचा शपथविधी | “पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर सरकार पडलं नसतं”, पाहा कुणी केला दावा

पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असा दावा फडणवीस यांनी केला आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

पहाटेचा शपथविधी | पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर सरकार पडलं नसतं, पाहा कुणी केला दावा
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 15, 2023 | 3:12 PM
Share

अहमदनगरः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून राज्याच्या राजकारणात विविध वक्तव्यांच्या लाटा येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटांवर संजय राऊतांनी (Sanjay Raut) सडेतोड उत्तरं दिली. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, हे रहस्य फडणवीस कधीही सांगू शकणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज यासंदर्भाने मोठं वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला अगदी विरोधी असं हे स्टेटमेंट आहे. तो शपथविधी जर शरद पवार यांना विचारून झाला असता तर सरकार पडलं नसतं, असं वक्तव्य थोरात यांनी केलंय.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

पहाटेच्या शपथविधीवरून बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असा दावा फडणवीस यांनी केला आहे. ते शरद पवार आहेत. त्यांना विचारून शपथविधी झाला असता तर ते सरकार पडलं नसतं. माझं पक्कं मत आहे की, ते पवार यांना विचारून झालं नाही. काही तरी वाद निर्माण करण्याचं काम सुरू आहे. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष न देता वाद करण्याचं काम सुरू आहे. ते फडणवीस करत आहेत. हा दिशाभूल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

शरद पवार यांच्याच परवानगीने पहाटेचा शपथविधी झाला, हे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य संजय राऊत यांनीही खोडून काढलंय. या पाठीमागे शरद पवार असते तर त्यांनी हे सरकार कोसळू दिलं नसतं. शरद पवार हे कायमस्वरुपी, स्थिर सरकार देण्यावर भर देतात. त्या काळात मीसुद्धा शरद पवार यांच्या सतत संपर्कात होतो. तेव्हा जे काय घडलं, ते देवेंद्र फडणवीस कधीही उघड करू शकणार नाहीत,असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामममध्ये?

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली आहे. उद्योग आणि रोजगारांप्रमाणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव इतर राज्यात पळवून नेलं जातंय, असा आरोप केला जातोय.

यावरून बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ भीमाशंकराची बांधणी पाहिली तर ते बारा ज्योतिंर्लिंगापैकी एक आहे. महाराष्ट्रातून काय काय पळवून न्यायचं असंच सुरू आहे. ज्यांनी उत्तर द्यायचं ते उत्तर देत नाही.

‘मी नाराज नव्हतोच’

बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेय यांच्यातील वादावरूनही थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. मी मी तर नाराजी व्यक्त केली नाही. पत्र व्यवहार तर सर्व संघटनेत चालतं. आम्हीसुद्धा तसा पत्रव्यवहार केल्याचं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलंय.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड