AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाटेचा शपथविधी | “पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर सरकार पडलं नसतं”, पाहा कुणी केला दावा

पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असा दावा फडणवीस यांनी केला आहे, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

पहाटेचा शपथविधी | पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर सरकार पडलं नसतं, पाहा कुणी केला दावा
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 15, 2023 | 3:12 PM
Share

अहमदनगरः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून राज्याच्या राजकारणात विविध वक्तव्यांच्या लाटा येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटांवर संजय राऊतांनी (Sanjay Raut) सडेतोड उत्तरं दिली. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, हे रहस्य फडणवीस कधीही सांगू शकणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज यासंदर्भाने मोठं वक्तव्य केलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला अगदी विरोधी असं हे स्टेटमेंट आहे. तो शपथविधी जर शरद पवार यांना विचारून झाला असता तर सरकार पडलं नसतं, असं वक्तव्य थोरात यांनी केलंय.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

पहाटेच्या शपथविधीवरून बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असा दावा फडणवीस यांनी केला आहे. ते शरद पवार आहेत. त्यांना विचारून शपथविधी झाला असता तर ते सरकार पडलं नसतं. माझं पक्कं मत आहे की, ते पवार यांना विचारून झालं नाही. काही तरी वाद निर्माण करण्याचं काम सुरू आहे. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष न देता वाद करण्याचं काम सुरू आहे. ते फडणवीस करत आहेत. हा दिशाभूल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

शरद पवार यांच्याच परवानगीने पहाटेचा शपथविधी झाला, हे देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य संजय राऊत यांनीही खोडून काढलंय. या पाठीमागे शरद पवार असते तर त्यांनी हे सरकार कोसळू दिलं नसतं. शरद पवार हे कायमस्वरुपी, स्थिर सरकार देण्यावर भर देतात. त्या काळात मीसुद्धा शरद पवार यांच्या सतत संपर्कात होतो. तेव्हा जे काय घडलं, ते देवेंद्र फडणवीस कधीही उघड करू शकणार नाहीत,असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामममध्ये?

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली आहे. उद्योग आणि रोजगारांप्रमाणे महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव इतर राज्यात पळवून नेलं जातंय, असा आरोप केला जातोय.

यावरून बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘ भीमाशंकराची बांधणी पाहिली तर ते बारा ज्योतिंर्लिंगापैकी एक आहे. महाराष्ट्रातून काय काय पळवून न्यायचं असंच सुरू आहे. ज्यांनी उत्तर द्यायचं ते उत्तर देत नाही.

‘मी नाराज नव्हतोच’

बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेय यांच्यातील वादावरूनही थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. मी मी तर नाराजी व्यक्त केली नाही. पत्र व्यवहार तर सर्व संघटनेत चालतं. आम्हीसुद्धा तसा पत्रव्यवहार केल्याचं स्पष्टीकरण बाळासाहेब थोरात यांनी दिलंय.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?