AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रीम कोर्टाचा गिरीश महाजनांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार, बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रमुख नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

सुप्रीम कोर्टाचा गिरीश महाजनांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार, बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?
बाळासाहेब थोरातImage Credit source: Tv9 Marathi
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 15, 2022 | 2:40 PM
Share

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रमुख नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील राजकारण, राज्यपालांची विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातली भूमिका, भाजपनं (BJP) विधानसभा अध्यक्षपदावरुन न्यायालयात घेतलेली धाव आणि काँग्रेसच्या पक्ष नेतृत्त्वासंदर्भात सुरु असलेल्या चर्चा यावर थोरात यांनी भाष्य केलं. भाजप नेते गिरीश महाजन यांनी सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी भाजपकडून त्यांसंदर्भात चुकीचं राजकारण सुरु असल्याचं म्हटलंय. तर, सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेसंदर्भातील याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिल्याची माहिती देखील थोरात यांनी दिली.

बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्ष पद तातडीने भरलं जावं, असं कोर्टाने सांगितले आहे.आम्ही राज्यपालांना विनंती करत आहोत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणाऱ्या गिरीश महाजन यांच्या डिपॉझिटची रक्कमही जप्त केली गेली होती. आता, गिरीश महाजन यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. भाजपकडून सध्या चुकीचं राजकारण सुरु आहे. अध्यक्ष निवडावा हे राज्यघटना सांगते.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वाची पक्षाला गरज

आम्ही सर्वजण सोनिया गांधी यांच्या पाठीशी आहोत. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाची गरज पक्षाला आणि देशाला आहे, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

 मुंबई उच्च न्यायालयानं महाजन यांना फटकारलेलं

मुंबई उच्च न्यायालयाच्या महाराष्ट्र सभापती निवडणूक नियमातील बदलाविरोधातील जनहित याचिका फेटाळण्याच्या आदेशाविरोधात भाजप आमदार गिरीश महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, यावर काल सुनावणी होवू शकली नव्हती. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेला (आवाजी मतदानाला) विरोध करणारी याचिका भाजपा आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, सदर याचिकेत याचिकेत तथ्य नसल्याचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दोन्ही याचिका फेटाळून लावल्या होत्या. एवढेच नव्हे तर दोन्ही याचिकाकर्ते यांची अनामत रक्कम एकूण 12 लाख रुपये सुद्धा न्यायालयाने जप्त केली होती.

इतर बातम्या:

tv9 Special : जे शिवराजसिंह चौहान सरकारनं केलं ते ठाकरे सरकार करणार का? कोरोना काळातलं वीज बिल सरसकट माफ

माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात शेकडो माथाडी कामगार आझाद मैदानात

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली