AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Special : जे शिवराजसिंह चौहान सरकारनं केलं ते ठाकरे सरकार करणार का? कोरोना काळातलं वीज बिल सरसकट माफ

महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) कोरोनाच्या (corona) काळात शेतक-यांचं अर्थिक कंबरडं मोडलं असताना सुध्दा त्यांच्याकडून अधिक वीज बील आकारली गेली. तसेच वीज बील न भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची वीज सुध्दा कापली गेली.

tv9 Special : जे शिवराजसिंह चौहान सरकारनं केलं ते ठाकरे सरकार करणार का? कोरोना काळातलं वीज बिल सरसकट माफ
file photoImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 15, 2022 | 2:28 PM
Share

मुंबई – महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) कोरोनाच्या (corona) काळात शेतक-यांकडून अधिक वीज बील आकारली केली. तसेच वीज बील न भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची वीज सुध्दा कापली गेली. पण आज मध्यप्रदेशातील सरकारने (madhya pradesh government) शेतकऱ्यांची सरसकट वीज बीले माफ केल्यानंतर महाराष्ट्राचं सरकार असा निर्णय घेणार का ? अशी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने मागणी केली आहे. “मला प्रदेशच्या सरकारचं अभिनंदन करायचं आहे. तिथल्या सरकारने 6 हजार कोटी रूपये देऊन शेतकऱ्यांची वीज बील माफी केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीने वीज बील वसुली केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील मध्यप्रदेश सारखी शेतकऱ्यांच्या वीज बिलाचे पैसे महावितरला द्यावे अशी आमची मागणी” असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मध्यप्रदेश सरकारने कोरोना काळातील वीजबिल माफ केले आहे. मध्य प्रदेशातील वीज ग्राहकांसाठी ही खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान ही घोषणा केली आहे. त्यामुळे सगळीकडे मध्यप्रदेश सरकारचं कौतुक होत आहे. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं वीज बील ठाकरे सरकार माफ करणार का ?

88 लाख घरगुती वीज ग्राहकांना फायदा

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केली की, मध्यप्रदेश सरकार कोरोना काळातलं शेतकऱ्यांचं सरसकट वीज बील माफ करीत आहे. याचा फायदा मध्यप्रदेशातील 88 लाख घरगुती वीज ग्राहकांना होणार आहे. तर 48 लाख ग्राहकांचे 189 कोटी रुपये मध्यप्रदेशातल्या महावितरण कंपनीला देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेचा फायदा राज्यातील प्रत्येकाला मिळणार आहे. आत्तापर्यंत ज्यांनी वीज बिलं भरली आहेत. त्यांची रक्कम पुढील वीज बीलात जमा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांची कुटुंब उद्वस्त झाली त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात राज्यातील 75 लाख 73 हजार ग्राहकांच्या वीज बिलांची वसुली राज्य सरकारने गोठवली होती. सरकारच्या या निर्णयामुळे ग्राहकांचे मूळ 3668 कोटी रुपये अडकले आहेत. यावरील अधिभार 102.96 कोटी इतका होता. मात्र, त्यानंतर शासनाने उपाय योजना राबवून वीज ग्राहकांना मोठी सुविधा देण्याची घोषणा केली होती.

वीजेचं निवडणूक गणित तुम्हाला माहित आहे का ?

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जो मुद्दा विरोधक जोरदारपणे मांडत होते, तोच मुद्दा सरकारने दीड वर्षापूर्वी संपवला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील लाखो वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पुढील निवडणुकीत सरकारला मोठा फायदा होणार याची मध्यप्रदेशात चर्चा आहे. वीज ग्राहकांच्या माध्यमातून मोठ्या लोकसंख्येला फायदा मिळवून देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे जेणेकरून पुढील निवडणुकीत पक्षासाठी वीजबिलाचा वादग्रस्त ठरू नये.

मोठी बातमीः शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार, नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा

…म्हणे महिला शेतकरी सन्मान वर्ष, सन्मान सोडाच- शेतकरी महिलेच्या कष्टाचीही कदर नाही..!

VIDEO: सीएम कार्यालयातून मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे विरोधकांची लिस्ट, हिटलिस्टवर दरेकर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप

Follow Us
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?